मुंबई: एक दिवस आधी शानदार वेग घेतल्यानंतर आज मंगळवारी लोकसभा निवडणूक २०२४च्या मतमोजणीच्या दिवशी मात्र बाजार चांगलाच कोसळला आहे. लोकसभा निवडणुकीच्या सुरूवातीच्या कौलानंतर बाजार चांगलाच कोसळला. यामुळे गुंतवणूकदारांचे मात्र चांगलेच नुकसान झाले आहे.सुरूवातीच्या सत्रात गुंतवणूकदारांना ११ लाख कोटीहून अधिक रूपयांचे नुकसान झाले आहे.
आज सकाळी बाजाराची सुरूवात मोठ्या नुकसानासह झाली. सेन्सेक्स उघडताच १ हजार अंकांनी कोसळला. जसजसे लोकसभा निवडणुकीचे कौल हाती येत आहेत तसतसा शेअर बाजार कोसळत गेला. सकाळी ९.५५ ला सेन्सेक्स १५०० अंकांनी घसरला होता.
या मोठ्या घसरणीचा परिणाम बाजारातील लिस्टेड कंपन्यांच्या व्हॅल्यूवरही झाला. बीएसई लिस्टेट कंपन्यांच्या बाजारातील पूंजीकरण कमी होऊन ४११.५१ लाख कोटी रूपयांवर आला. सोमवारी बाजाराने जबरदस्त उसळी घेतली होती. निफ्टी तसेच सेन्सेक्समध्ये ऐतिहासिक वाढ झाली होती. सेन्सेक्स २,५०७.४७ अंकांनी वाढ होत तो ७६,४६८.७८ अंकांवर बंद झाला होता. यावेळी सेन्सेक्सने ७६,७३८,८९ अकांचे नवे शिखर गाठले होते.
बाजाराचे कोसळणे हे लोकसभा निवडणुकीच्या सुरूवातीच्या कौलाचा परिणाम आहे. सुरूवातीच्या कौलामध्ये भाजपचे अनेक उमेदवार पिछाडीवर असल्या कारणाने याचा बाजाराव परिणाम झाला आहे.
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…