मुंबई : लोकसभा निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीगणिक होत असलेल्या मतांतील फरकांमुळे अनेकांचे ठोके चुकत आहेत. देशपातळीवर एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. मात्र, तरीही एनडीएने मतमोजणीत पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. एनडीएची सध्या ३०० हून अधिक जागांवर आघाडी आहे.
गांधीनगरमध्ये अमित शाह यांनी दीड लाखांहून अधिक मतांनी आघाडी मिळवली आहे. तर वाराणसीतून देखील नरेंद्र मोदी आघाडीवर आहेत. हिमाचलच्या मंडीमधून कंगना रनौत ३६ हजार मतांनी आघाडीवर आहे, तर ९९,१९६ मतांनी हेमामालिनी आघाडीवर आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सध्या अनेक जागांवर आघाडी मिळवताना दिसत आहे. मात्र भाजपाने आपले वर्चस्व असलेल्या कोकणातील रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात आघाडी मिळवली आहे. या ठिकाणी नारायण राणे ७ हजार मतांनी पुढे आहेत. तर रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे सुनील तटकरे ३३ हजार मतांनी पुढे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला बालेकिल्ला असलेल्या ठाणे व कल्याणमध्ये आघाडी कायम राखली आहे.
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…