मुंबईत महायुतीच्या संख्याबळात घट

Share

मुंबई : महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस याचा समावेश असणाऱ्या महायुतीच्या संख्याबळात घट झाली असून काँग्रेस, शपग राष्ट्रवादी, उबाठा गटाची शिवसेना यांचा समावेश असणाऱ्या महाविकास आघाडीने मात्र राज्यात मुसंडी मारली आहे. महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी गणल्या जाणाऱ्या मुंबईवर मात्र महाविकास आघाडीचेच वर्चस्व राहीले असून महायुतीला मुंबईत दणदणीत पराभव स्विकारावा लागला आहे.

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी तीन जागांवर उबाठा गटाची शिवसेना, एका जागेवर काँग्रेस अशा चार जागांवर महाविकास आघाडीला तर भाजपाला व शिवसेनेला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे. महायुतीकडून मुंबईत भाजपाने तीन जागा तर शिवसेनेने तीन जागा लढविल्या होत्या. शिवसेनेच्या राहूल शेवाळे, आमदार यामिनी यशवंत जाधव या शिवसेनेच्या दोन उमेदवारांना उबाठा गटाच्या शिवसेनेच्या अनिल देसाई, अरविंद सावंत यांनी पराभूत केले आहे. उत्तर पूर्व मुंबई (ईशान्य मुंबई) हा गेल्या काही निवडणुकांपासून भाजपाचा बालेकिल्ला गणला जात असून या ठिकाणी भाजपाचा उमेदवार बदलत गेला तरी या जागेवरुन भाजपाचाच उमेदवार विजयी होत होता. या मतदारसंघात उबाठा गटाच्या शिवसेनेचे संजय दिना पाटील विजयी झाले आहेत.

उत्तर मध्य मुंबईमधून भाजपाने पूनम महाजन यांना तिकीट नाकारत त्याजागी अॅड. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली होती. त्या ठिकाणी काँग्रेसच्या वर्षां गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांचा पराभव केला आहे. उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपाने विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना तिकिट नाकारत पियुष गोयल यांना उमेदवारी दिली होती. उत्तर मुंबई मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला असल्याने पियुष गोयल मोठे मताधिक्य घेत विजयी झाले आहेत. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर हे अवघ्या ४८ मतांनी विजयी झाले आहेत. वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव केला.

Recent Posts

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

8 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

50 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

53 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

1 hour ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

2 hours ago