Kolhapur accident : कोल्हापुरात भीषण अपघात; तिघांना चिरडले, सहा गंभीर जखमी

Share

कोल्हापूर : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण संपूर्ण देशात गाजत असतानाच आज कोल्हापूर शहरात देखील असाच एक भीषण अपघात (Kolhapur accident) झाला. या अपघातात भरधाव वेगात असलेल्या कारने येथील कायम वर्दळीचे ठिकाण असलेल्या सायबर चौकात चार-पाच दुचाकींना जोरदार धडक दिली. या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे या चौकात वाहतूक सुरू असताना अचानक एका भरधाव कारने राजारामपुरीकडून येताना चौकामध्येच एकमेकांना क्रॉस होणाऱ्या काही दुचाकींना जोरदार धडक दिली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

सायबर चौक हा राजारामपुरी, शिवाजी विद्यापीठ आणि राजाराम कॉलेजला जोडतो आणि या चौकात मोठी गर्दी असते. या चौकात अनेक शाळा आणि सायबर कॉलेज आहेत.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून कार चालकाविरुध्द गुन्हा नोंदवला आहे. गंभीर जखमी असलेल्यांवर सीटी हॉस्पिटल आणि सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Recent Posts

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…

13 minutes ago

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…

17 minutes ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

30 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

50 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

1 hour ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

1 hour ago