Jalgaon news : जळगावमध्ये तीव्र उष्णतेमुळे गव्हाच्या पोत्याने भरलेला ट्रक पेटला!

Share

तापमान ४४ अंश सेल्सियसवर गेल्याने घडली दुर्घटना

जळगाव : राज्यभरात सूर्य आग ओकत असून उन्हाचा तीव्र तडाखा (Intense heat) बसत आहे. काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसत असल्या तरी उन्हाची समस्या कायम आहे. मराठवाड्यासह विदर्भात तर तापमानात प्रचंड वाढ झाल्याने पाणीटंचाईची समस्याही भेडसावत आहे. धुळे (Dhule), जळगावमध्ये (Jalgaon) उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. या जिल्ह्यांत तापमान ४४ अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. यामुळेच जळगावमध्ये उन्हाच्या तडाख्याने एका ट्रकला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.

जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची मोठी लाट पसरली आहे. जळगावातील जामनेर तालुक्यात भवानी माथाजवळ जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर अचानक एका ट्रकने पेट घेतला. या ट्रकमधून गव्हाच्या पोत्यांची वाहूतक करण्यात येत होती. या घटनेनंतर अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले, मात्र अग्निशमनचे बंब येईपर्यंत ट्रकचे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. गव्हाच्या पोत्यांचेही नुकसान झाले आहे.

या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे, नागरिकांनी दुपारच्या प्रहरात अनावश्यक घराबाहेर न पडण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

2 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

3 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

4 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

4 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

4 hours ago