छ्त्रपती संभाजीनगर : एकीकडे निवडणुकीचे (Loksabha Election 2024) वारे तर दुसरीकडे उन्हाच्या लाटांनी महाराष्ट्र चांगलाच तापला आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र पुन्हा महाराष्ट्रात उकाड्याने चांगलाच पेट घेतला आहे. कडक उन्हामुळे नागरिक हैराण झालेच आहेत त्यासोबत प्राण्यांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
अशातच सध्या मराठवाड्यात (Marathwada) दुष्काळाची परिस्थिती आणखी भीषण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या दुष्काळासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार आहे. त्याचसोबत या बैठकीला सर्व जिल्हाधिकारी, पालकमंत्री, कृषी अधिकारी, महावितरणचे अधिकारी यासह इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज दुपारी ३ वाजता छत्रपती संभाजीनगर मधील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची आणि भीषण पाणी टंचाईवर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. याबाबत तत्काळ मदत कशी आणि कोणती करावी याचंही नियोजन करण्यात येणार आहे. तसेच पाळीव प्राण्यांना लागणाऱ्या चाऱ्याचा पुरवठा कसा करावा, या संदर्भातदेखील या बैठकीत चर्चा होणार आहे. तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
आगामी काळात ही स्थिती जास्तच गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तात्काळ मदत आणि उपायोजनांची गरज आहे. मात्र निवडणुकीमुळे राज्यात सध्या आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे अशा स्थितीत मराठवाड्यासह इतर दुष्काळसदृश भागांना मदत करताना अडचणी येत आहेत. राज्यातील काही भागातील दुष्काळसदृश स्थिती लक्षात घेता त्यांना मदत करण्यासाठी, उपायोजना आखण्यासाठी आचारसंहिता शिथिल करावी, अशी राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे.
दरम्यान राज्य सरकारच्या या विनंतीवर निवडणूक आयोग विचार करत आहे. आज याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता शिथील झाल्यास राज्य सरकारच्या दुष्काळी उपाययोजनांना गती मिळणार आहे.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…