IPL 2024: विराट कोहली की संजू सॅमसन? आज कोण मारणार बाजी

Share

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४च्या हंगामात आज एलिमिनेटरचा सामना रंगत आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने असतील. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून खेळवला जाईल.

या सामन्यात संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थानच्या संघासमोर आत्मविश्वासाने भरलेल्या विराट कोहलीच्या बंगळुरू संघाचे मोठे आव्हान असणार आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृ्त्वात आरसीबीने चमत्कारिक कामगिरी करत प्लेऑफ गाठली आहे.

सलग ६ सामने जिंकत प्लेऑफमध्ये पोहोचला बंगळुरूचा संघ

एक वेळ अशी होती की राजस्थान टॉप २मध्ये राहील असे वाटत होते. मात्र सलग ४ सामन्यातील पराभव आणि केकेआरविरुद्धचा सामना पावसाने धुतला गेल्याने ते सनरायजर्स हैदराबादनंतर तिसऱ्या स्थानावर राहिले. दुसरीकडे आयपीएलमधून बाहेर पडण्याच्या स्थितीत असलेला बंगळुरूच्या संघाने जबरदस्त कामगिरी करत चौथे स्थान गाठले.

बंगळुरूने सलग ६ सामन्यात विजय मिळवत प्लेऑफचे तिकीट निश्चित केले. त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी आश्चर्यचकित करणारा होता.

अहमदाबादमध्ये या संघाचे पारडे जड

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आजचा सामना रंगत आहे. या मैदानावर या हंगामात १२ डावांत केवळ दोनवेळा २०० पार धावसंख्या झाली आहे. हे स्टेडियम रॉयल्सच्या गोलंदाजांना फायदेशीर ठरू शकते. शिस्तीने गोलंदाजी करणाऱ्या संघाचे पारडे जड ठरू शकते.

Recent Posts

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

23 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

56 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

2 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago