मुंबई: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना रद्द होण्यासोबतच आयपीएलच्या लीग सामन्यांची सांगता झाली आहे. पावसामुळे आयपीएलचा ७०वा सामना एकही बॉल न खेळता रद्द करण्यात आला. आयपीएल प्लेऑफची लाईनअप तयार झाली आहे.
आता प्लेऑफचे राऊंड सुरू होतील. याची सुरूवात केकेआर विरुद्ध हैदराबाद सनरायजर्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. हा क्वालिफायर १ सामना असेल जो अहदाबादमध्ये २१ मेला खेळवला जाईल. राजस्थान विरुद्ध बंगळुरू यांच्यातील एलिमिनेटरचा सामनाही याच ठिकाणी रंगेल.
सुरूवातीच्या काळात बरेच दिवस पॉईंट्स टेबलमध्ये आपला दबदबा बनवून ठेवणाऱ्या राजस्थानला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्सला विजय मिळवायचा होता. मात्र पावसाने त्यांच्या आशांवर पाणी फिरवले.
कोलकाता नाईट रायडर्सने १४ सामन्यात २० गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये पहिले स्थान मिळवले. तर सनरायजर्स हैदराबाद १७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिले. राजस्थान रॉयल्सचेही १७ गुण आहे. मात्र नेट रनरेटमुळे त्यांना तिसरे स्थान मिळाले. आरसीबीने नाटकीय अंदाजात पुनरागमन करताना चौथे स्थान मिळवले. आरसीबीने सीएसकेला नेटरनरेटच्या आधारावर मागे सोडत चौथे स्थान मिळवले.
केकेआर विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात क्वालिफायर १ सामना खेळवला जाईल. हा सामना २१ मेला अहमदाबादमध्ये रंगेल तर २२ मेला एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. क्वालिफायर २ सामना २१ मेला खेळवला जाईल. हा सामना क्वालिफायर १मधील हरणाऱ्या आणि एलिमिनेटरमधील विजेत्या संघात होणार आहे. चेन्नईमध्ये हा सामना रंगेल. फायनल सामना २६ मेला क्वालिफायर १ मधील विजेता आणि क्वालिफायर २मधील विजेता संघ यांच्यात होईल. फायनल सामना चेन्नईमध्येच खेळवला जाईल.
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…