नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतर काशी-मथुरेतेही मंदिर उभारले जाणार अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली. मात्र, काशी अथवा मथुरेत मंदिर उभारणीचे भाजपचे कोणतेही नियोजन नाही, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी स्पष्ट केले आहे.
वाजपेयींच्या काळात पक्ष चालवण्यासाठी आरएसएसची गरज होती. त्यावेळी भाजप लहान पक्ष होता. सुरुवातीला आम्ही थोडे अकार्यक्षम होतो, त्यामुळे पक्षाला आरएसएसची गरज होती. मात्र आता भाजप ताकदवान झाल्याचे वक्तव्य नड्डा यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरुन विरोधकांनी भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच नड्डा यांनी काशी-मथुरेतील वादग्रस्त जागेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, काशी किंवा मथुरेमध्ये मंदिर उभारणीची भाजपची कोणतीही प्लॅन योजना नसल्याचे नड्डा यांनी म्हटले आहे. तसेच, यासंदर्भात अनेकांकडून भावनिक दावे केले जात असल्याचंही ते म्हणाले.
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…