मुलुंड : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) दृष्टीने कालची संध्याकाळ खूप महत्त्वाची होती. काल शिवाजी पार्कवर (Shivaji Park) महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची एकत्रित सभा होती. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सभेसाठी त्यांचेही नेते एकत्र जमले होते. त्याच दरम्यान, भाजपाकडून ईशान्य मुंबईतून उमेदवारी मिळालेले मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांच्या कार्यालयासमोर राडा झाला. त्यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला असून तो ठाकरे गटाकडून (Thackeray Group) झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.
एकीकडे महायुती व महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींच्या काल मुंबईत सभा चालू असताना दुसरीकडे मिहीर कोटेचा यांच्या मुलुंडमधील कार्यालयात मोठा राडा सुरू झाला. त्यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आल्याचा दावा भाजपाने केला आहे. यानंतर कार्यालयासमोर भारतीय जनता पक्ष व ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आमने-सामने जमा झाले होते.
हा प्रकार घडल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते प्रसाद लाड यांनी घटनास्थळी भेट दिली. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही घडलेल्या प्रकाराचा आढावा घेतला. यानंतर प्रसाद लाड यांनी भ्याड हल्ला म्हणत या घटनेचा निषेध केला. “संजय पाटलांना पराभव दिसू लागल्यामुळे असे हल्ले होत आहेत”, असा आरोप त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर आता मिहीर कोटेचांनी ठाकरे गटाला थेट आव्हान दिलं आहे.
राड्याप्रकरणी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना मिहीर कोटेचा यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “मानखुर्दचे नवाब संजय दीना पाटील…आज पंतप्रधानांच्या सभेसाठी आम्ही सगळे शिवाजी पार्कला निघाल्यानंतर तुमचे गुंड मुश्ताक खान आणि इतरांनी माझ्या वॉररूमवर भेकड हल्ला केला. माझ्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. आज मी शपथ घेतो. निवडून आल्यानंतर तुमचे सगळे काळे धंदे, ड्रग्ज, मटका, गुटखा हे बंद करणारच. मानखुर्दचं नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर करणारच”, असं मिहीर कोटेचा म्हणाले.
मिहीर कोटेचा यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबत “मुंबईकरांना आता ठरवायची वेळ आलीये की लोकसभेच्या गेटबाहेर गुटखा विकणारा खासदार पाठवायचा की तुमचा सेवक पाठवायचा”, असा खोचक सवालही त्यांना पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. या राड्याप्रकरणी मविआच्या २५-३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…