पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीचं (Pimpri Chinchwad Crime) प्रमाण प्रचंड वाढलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणाहून सातत्याने गोळीबाराच्या (Firing) घटना समोर येत आहेत. कधीकधी क्षुल्लक कारणावरुनही थेट गोळीबारापर्यंत प्रकरण पोहोचत असल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच शहरामधील चिखली परिसरात पुन्हा एक गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये व्यावसायिक स्पर्धेतून एका व्यावसायिकाने दुसऱ्या व्यावसायिकवर थेट गोळ्या झाडल्या. मात्र, सुदैवाने गोळी दंडाला लागल्याने त्याचा जीव वाचला आहे.
चिखलीतील या धक्कादायक घटनेत अजय सुनील फुले (वय १९, रा. मोहननगर, चिंचवड) आणि हर्षल सोनवणे (रा. जाधववाडी, चिखली) यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून व्यवसायिक स्पर्धेतून वाद सुरू होते. या वादातून हर्षल सोनवणेने दोन मित्रांच्या मदतीने कट रचून अजय फुलेवर गोळीबार केला. यामध्ये सुदैवाने अजयचा जीव वाचला पण तो जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी हर्षलला अटक केली आहे. त्याच्या सह श्याम चौधरी, कीर्तीकुमार भिऊलाल लिलारे यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
अजय फुलेवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, गोळीबार केल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षल सोनवणे फरार झाला होता. चिखली पोलीस हर्षलचा शोध घेत असताना तो चाकणच्या दिशेने गेल्याची माहिती समोर आली. पोलिसांच्या पथकाने पाठलाग करुन नाणेकरवाडी परिसरातून हर्षलच्या मुसक्या आवळल्या.
संबंधित घटनेतील अजय व हर्षल या दोघांचाही गॅस शेगडीचा व्यवसाय होता. त्यामुळे व्यावसायिक स्पर्धेतून दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाद सुरु होते. त्यातच अजयला संपवण्याचा विचार हर्षलच्या डोक्यात आला आणि यासाठी त्याने त्याच्या दोन मित्रांची मदत घेतली. श्याम चौधरी आणि कीर्तीकुमार लिलारे हे हर्षलचे दोन मित्र अजयच्या दुकानात वाद मिटवण्यासाठी गेले होते. मात्र, तेव्हाच हर्षलही त्या ठिकाणी आला आणि त्याने थेट पिस्तुल काढून तीन गोळ्या अजयवर झाडल्या. एक गोळी अजयच्या दंडाला लागली तर दुसरी गोळी किर्तीकुमार लिलारेच्या मानेला लागली. या प्रकरणी हर्षल आणि त्याच्या मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…