Weather updaes : मुंबईत आजही जोरदार पावसाची शक्यता! राज्यात इतर ठिकाणी कशी असणार परिस्थिती?

Share

हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

मुंबई : मुंबईसोबतच नवी मुंबई, बदलापूर, कल्याण, पालघर, नाशिक परिसरात काल पडलेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हाहाकार माजवला. यामध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक जणांना जीवही गमवावा लागला. घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिग (Ghatkopar hoarding news) कोसळले तर वडाळा येथे पार्किंग लॉट कोसळल्याने प्रचंड नुकसान व जीवितहानी झाली. यानंतर आज मुंबई व राज्यात इतर ठिकाणी कशी परिस्थिती असेल, याविषयी हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने (Mumbai Center of Meteorological Department) अंदाज वर्तवला आहे. मुंबईत आजही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मुंबईत पावसाचा यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही मुंबईत वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. या सर्व भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नारिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावासाचा अंदाज

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यासह (४०-५० किमी प्रतितास वेग), हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

Recent Posts

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

1 minute ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

34 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

1 hour ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

1 hour ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago