Manoj Jarange Patil : लोकसभेच्या निकालाच्या दिवशीच मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार!

Share

‘या’ कारणासाठी करणार उपोषण

जालना : मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी लावून धरत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्यभरातल्या मराठ्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी केलेल्या उपोषणामुळे राज्य सरकारनेही मराठा आरक्षणासाठी कंबर कसून प्रयत्न केले आणि मराठ्यांना त्यांचे हक्काचे आरक्षण मिळवून दिले. मात्र, त्यानंतर जरांगे यांच्या मागण्या बदलत गेल्या आणि त्या पूर्ण न करण्याबाबत त्यांनी सरकारला जबाबदार धरले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले. त्यामुळे जरांगेंना सर्वच स्तरांतून रोष पत्करावा लागला. यानंतर जरांगेंचा प्रभाव कमी झाला. मात्र, ते आता पुन्हा एकदा उपोषण करणार, अशी त्यांनी घोषणा केली आहे. लोकसभेच्या निकालाच्या (Loksabha Election Result) दिवशीच म्हणजे ४ जूनपासून मनोज जरांगे उपोषणाला बसणार आहेत.

देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. राजकीय पक्षांचं भवितव्य ठरवणार्‍या या निवडणुकीत विजयाकरता प्रत्येक पक्ष जोरदार प्रचार करत आहे. मात्र, त्यातच मनोज जरांगेंनी उपोषणाची घोषणा करत माध्यमांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य सरकारने दिलेल्या दहा टक्के आरक्षणाचा मराठा समाजाला फायदा झालेला नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना आज मनोज जरांगे म्हणाले, “माझा हा लढा मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आहे. मी ४ जूनपासून पुन्हा बेमुदत उपोषण करणार आहे. मुळात सर्वच पक्षात मराठा समाजाचे नेते आहेत. मराठा कोणताही असला तरी त्याला राज्य सरकारने दिलेल्या १० टक्के आरक्षणाचा कोणताही फायदा झालेला नाही. यामध्ये भाजपातील गरीब मराठा समाजाच्या मुलांचंही नुकसान झालं आहे. सरकारने १० टक्के आरक्षण दिलं आहे, पण ते अजूनही लागू झालेलं नाही”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

पुढे ते म्हणाले, “४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल असला, तरी सकाळी ९ वाजता माझ्या उपोषणाची सुरुवात होईल. जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे. सहा कोटी मराठा समाजाचा आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे. मराठा समाजाला आता सगळं माहिती आहे. एका मुलाप्रमाणे ते माझी काळजी घेतात. माझे उपोषण सुरु झाल्यानंतर मराठा समाज गावोगावी शांततेत आंदोलन करेल, असा मला विश्वास आहे”, असं ते म्हणाले.

Recent Posts

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

14 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

16 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

36 minutes ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

56 minutes ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

1 hour ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

1 hour ago