डेहराडून : हिंदू धर्मात चार धामची यात्रा करणं अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. त्यामुळे भाविकांना बद्रीनाथ येथील दरवाजे उघडण्याची प्रतिक्षा असते. देशातील चारधामांपैकी गंगोत्री, यमुनोत्री आणि केदारनाथ धामचे दरवाजे १० मे रोजी उघडण्यात आले. त्यानंतर आज पार पडलेल्या पुजेनंतर अत्यंत भक्तीमय वातावरणात बद्रीनाथ धामचे दरवाजेही उघडण्यात आले आहेत. हे मंदिराचे दरवाजे पुढील सहा महिने भाविकांसाठी खुले राहणार आहेत.
दरम्यान, बद्रीनाथ मंदिरात प्रवेशासाठी आज पहाटेच हजारो भाविकांनी गर्दी केली होती. प्रवेशद्वार देखील फुलांनी सजवण्यात आले. मंदिराच्या सजावटीसाठी १५ क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला आहे. धार्मिक पूजविधी करत मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. हलक्या पावसाच्या सरी, लष्करी बँड, ढोलकीचे मधुर सूर, स्थानिक महिलांचे पारंपारिक संगीत आणि भगवान बद्रीनाथाचे स्त्रोत अशा भक्तीमय वातावरणात भाविक मंत्रमुग्ध झाले होते.
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…