जातीपातीचे राजकारण आणि धार्मिक धुमाकुळ घालण्याचा प्रयत्न

Share

राज ठाकरे यांची विरोधकांवर टीका

पुणे : आजपर्यंत देशात झालेल्या लोकसभेच्या निवडणुका मुद्यांवर लढल्या गेल्या. ही पहिलीच निवडणूक आहे, ज्यामध्ये कोणताच मुद्दा नाही. जातीपातीचे राजकारण आणि धार्मिक धुमाकुळ घालण्याचा विरोधकांकडून प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सर्व हिंदू बांधवानी एकत्र येऊन मुरलीधर मोहोळ आणि महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा असे आवाहन ‘मनसे’ पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केले.

मोहोळ यांच्या प्रचारासाठी ठाकरे यांच्या सभेचे सारसबाग येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, मनसेचे नेते बाबू वागस्कर, अजय शिंदे, किशोर शिंदे, प्रविण तरडे, श्रीनाथ भिमाले, आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, पुण्याची वेगाने वाढ होत आहे. शहराची लोकसंख्या ७० लाखांपर्यंत पोहचली आहे. शहराचे नियोजन झाले नाही तर शहरे नष्ट होतील. शहरे वाचवण्याची जबाबदारी खासदार, आमदार आणि नगरसेवकांवर आहे. त्यामुळे जो पक्ष सत्तेत येणार आहे, त्या पक्षाच्या उमेदवाराच्या सभेसाठी मी आज आलो आहे. पुणे विद्येचे माहेरघर आहे. याठिकाणी अनेक विद्यापीठे शासकीय संस्था आहेत. उद्योग आहेत. केंद्र सरकारला पुण्यातून ७५ हजार कोटींचा कर जातो. अशा शहराचे नियोजन योग्य पध्दतीने होणे आवश्यक असल्याचेही ठाकरे यांनी नमूद केले.

गेल्या काही वर्षापासून राज्यात जातीपातीचे राजकारण सुरु झाले आहे. शाळा आणि महाविद्यालयापर्यंत हे राजकारण पोहचले आहे. त्यामुळे अशा वातावरणात लोक राहण्यास तयार नाहीत. जातीपातीचे राजकारण कशासाठी ? आपल्याला चांगली शहरे पाहिजेत. काँग्रेसला मतदान करण्यासाठी फतवे निघत आहेत. त्यामुळे हिंदू बांधवांनी सुध्दा एकत्र येवून महायुतीला मतदान केले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.

यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण गुढीपाडव्याला पाठिंबा दिला. माझ्यासाठी आपण अक्षयतृतीयेला सभा घेत आहात याचा आनंद आहे. पुण्याविषयी आपल्या मनात प्रेम आहे. पुण्याचा विकास करत असताना आपल्या संकल्पनेतील पुण्याचा विकास करण्याचा प्रयत्न मी करेल, असे आश्वासनही दिले.

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

1 hour ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

1 hour ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

2 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

2 hours ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

2 hours ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

3 hours ago