Lok Sabha Election 2024: तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

Share

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाल आज सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात केली आहे. देशभरातील अनेक दिग्गज नेत्यांचे भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनीही जनतेला भरभरून मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. गुजरातच्या अहमदाबाद येथील निशान हायर सेकंडरी स्कूलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदानाचा हक्क बजावला.

आजच्या तिसऱ्या टप्प्यात १२ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील एकूण ९३ जागांवर मतदान होत आहे. खरंतप ९४ जागांवर आज मतदान होणार होते मात्र भारतीय जनता पक्षाने गुजरातच्या सुरतमध्ये बिनविरोध निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे या टप्प्यात ९३ जागांवर मतदान होत आहे.

तिसऱ्या टप्प्यात गोवामधील २, गुजरातच्या २५, छत्तीसगडच्या ७, कर्नाटकमधील १४, आसाममधील ४, बिहारच्या ५, मध्य प्रदेशातील ११, उत्तर प्रदेशातील १०, पश्चिम बंगालच्या ४, दादरा नगर हवेली आणि दमणच्या जागांवर मतदान होत आहे.

या टप्प्यात महाराष्ट्रातील रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या ११ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून केंद्रीय मंत्री नारायण राणे तर सातारा मतदारसंघातून उदयनराजे निवडणूक लढवत आहेत. सोलापुरमधून महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे या मैदानात आहेत तर महायुतीकडून राम सातपुते निवडणूक लढवत आहेत. तर कोल्हापूरमध्ये महायुतीच्या संजय मंडलिक आणि मविआच्या छत्रपती शाहू महाराजांमध्ये सामना रंगणार आहे.

आजचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यासाठी १३ मेला मतदान, पाचव्या टप्प्यासाठी २० मेला, सहाव्या टप्प्यासाठी २५ मेला आणि सातव्या टप्प्यासाठी १ जूनला मतदान होणार आहे. १८व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जूनला जाहीर केले जातील.

Recent Posts

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

4 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

46 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

49 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

1 hour ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

1 hour ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

2 hours ago