मुंबई : बहुचर्चित असलेल्या मुंबई कोस्टल रोडच्या (Mumbai Coastal Road) पहिल्या दहा किमी अंतराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यामुळे मुंबईला पश्चिम उपनगराला जोडणे शक्य झाले आहे. अनेकजण या कोस्टल रोडवरुन प्रवास करतानाचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यातच आता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी देखील नुकतेच कोस्टल रोडवरुन प्रवास करत त्यांचा अनुभव शेअर केला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारचे देखील कौतुक केले आहे. त्यांच्या या ट्विटवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी देखिल अगदी फिल्मी स्टाईल रिप्लाय दिला आहे.
मुंबई ते कांदिवली असा या कोस्टल रोडचा प्रकल्प आहे. दक्षिण कोस्टल रोड हा १०.५८ किमी लांबीचा आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च हा १२,७२१ कोटी रुपये आहे. नुकतेच लोकार्पण झालेल्या अटल सेतूवरही अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यानंतर आता कोस्टल रोडच्या कामाचे देखील कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘T 4999 – Oh ! Boy !! went to work .. after Sea Link on to Coastal Road and Tunnel underground .. JVPD, Juhu to Marine Drive , 30 mins .. !! वाह ! क्या बात है! साफ़ सुथरी नयी बढ़िया सड़क, कोई रुकावट नहीं.’
अमिताभ यांच्या ट्विटपेक्षा यावर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी फिल्मीस्टाईलमध्ये म्हटले आहे की, “Parampara, Pratishtha, Anushasan, Ye iss sarkar ke teen stambh hai !” e wo aadarsh hain jinse hum Bharatiyon ka kal banaate hai”…, अमिताभ जी तुम्ही तुमच्या प्रवासाचा अनुभव शेअर केलात, त्याबद्दल खूप आभार. मुंबई आता अपग्रेड होतेय आणि आम्ही मुंबईकरांसाठी वेळ वाचवणा-या प्रवासाचा अनुभव निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत.
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…