Gajanan Maharaj : आत्मविश्वास मनी दृढ असावा…

Share
  • गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला

मानसी बापट बंगलोर यांना आलेला श्री गजानन महाराजांचा अनुभव. दि. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी भाऊबीज असल्यामुळे, सगळ्या भावांबरोबर सकाळी बोलून घेतले. मी बंगळूरुला असल्याने, भेटायला जाणे शक्य नव्हते. व्हाॅट्सअॅपला भावांसोबतचे फोटो स्टेटस ठेवून झाले.

घरातली सकाळची कामे आवरली आणि आता बसावे म्हटले, तर आलोक माझा मुलगा म्हणाला की, “चल आई पटकन जिओ सिम घेऊन येऊ.” मला फिरायला खूप आवडते म्हणून मीही निघाले. सिम घेऊन झाले. एका मार्केटमध्ये थोडा फेरफटका मारला आणि आलोकने कबूल केल्याप्रमाणे मला ज्यूस पाजला. सकाळचे ११.४५ वाजले होते. आता ५ मिनिटांत घरी पोहोचणार तेवढ्यात घराकडे जाणाऱ्या वळणावर मोटारसायकल वाळूवरून घसरली आणि मी जोरात आपटले आणि गुडघ्याजवळ कट असा आवाज झाला आणि माझ्या पायाची संवेदनाच गेली. मुलाने ही कसाबसा तोल सावरला, त्याला पायाला खरचटले. मला इतका मानसिक धक्का बसला होता की, धक्का आणि दुखणे यात काहीच समजत नव्हते. लोक गोळा झाले, त्यांनी मला उचलून रिक्षामध्ये बसवले आणि आम्ही नर्सिंग होमकडे निघाली. प्रचंड वेदना होत असल्यामुळे काहीच सुचत नव्हते. आता पुढे आपले कसे होणार, या विचाराने मी गांगरून गेले होते. हॉस्पिटल येताच मला उचलून हॉस्पिटलमध्ये नेले. मी खूप रडत होते. हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर माझ्यावर ओरडल्यावर, तर मला अजूनच काही सुचेना. आत नेऊन सलाईनमधून क्रोसिन दिल्यावर माझ्या पायात संवेदना आली आणि मग मी थोडी रिलॅक्स झाले. तोपर्यंत मला सतत वाटत होते की, माझा पाय तुटलाय. एक्स-रे केल्यावर डॉक्टरांनी सांगितले की, मांडी जवळचे हाड मोडलेय आणि त्याची मोठी शल्यक्रिया करावी लागेल. झाले परत मी एकदम उदास झाले. माझी रवानगी पहिल्या मजल्यावरच्या स्पेशल रुममध्ये झाली. आता तेवढ्यात माझे मिस्टर आणि सून कल्याणी देखील दवाखान्यात आले होते. प्रचंड वेदना सहन करत, मी महाराजांचा धावा करत होते. आलेली परिस्थिती स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता. फक्त एक चांगले होते की, माझ्या घरचे माझ्या पाठीशी खंबीरपणे होते आणि डॉक्टर तर अगदी देवमाणूसच.

१६ तारखेला रात्री ऑपरेशन यशस्वी झाले आणि वेदनाही कमी झाल्या. सतत महाराजांचा धावा केल्याने आणि माझ्या मित्र-मैत्रिणी, फॅमिली या सगळ्यांच्या प्रार्थनेमुळे गजानन महाराज मला २ मिनिटांसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये दिसले आणि मग माझ्या मनाने उभारी घेतली. पण म्हणतात ना, ‘सरळ जाईल, ते आयुष्य कसले.’ अचानक माझी शुगर वाढली आणि हिमोग्लोबिन कमी झाले. मग पुन्हा नवीन औषधे, पुन्हा वेगवेगळ्या चाचण्यांना सामोरे जावे लागले. त्यातूनही महाराजांनी सुखरूप बाहेर काढले. २० तारखेला सगळ्या टेस्ट्स नॉर्मल आल्यावर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आणि मी माझ्या घरी आले. अॅम्ब्युलन्समधून उतरले आणि मग मी वॉकरच्या साहाय्याने घरी आले, तरीही अधूनमधून मला रडायला येत होते. आपल्याच नशिबी हे असे का? असे ही वाटत होते. पण मग असा विचार केला की, महाराजांनी आपल्याला वाचवले आहे आणि आता काही झाले तरी खचून जायचे नाही. सतत नामस्मरण करत राहायचे आणि लवकरच आपल्या पायाने चालायचे. त्यासाठी माझ्यावर लक्ष ठेवायला एक नर्स ठेवली आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मी एका दिवसातच व्यवस्थित झाले.

माझ्यात प्रचंड आत्मविश्वास आला. मी पडले त्या दिवशीच नांदेडहून खास माझ्यासाठी माझ्या सुनेच्या आई आमच्याकडे आल्या. हीदेखील पूर्वपुण्याईच म्हणावी लागेल की, मला आजूबाजूला सगळी छान माणसे मिळाली आहेत. रक्ताची नाती तर करतातच, पण जोडलेली नाती सोबत आहेत. या बाबतीत मी अतिशय समृद्ध आणि धनवान आहे असे म्हणायला हरकत नाही. आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि सहकार्याने मी यातून दहा दिवसांतच बाहेर पडले आहे आणि लवकरच पूर्ण बरी होणार, यात शंका नाही. देवाचीच कृपा म्हणून मी आज तुम्हा बरोबर आहे.

Recent Posts

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीटदर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने आजपासून…

4 minutes ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

17 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

37 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

57 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

59 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

2 hours ago