मुंबई: फळे खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले राहते. यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होते. फळांमध्ये ती सर्व पोषकतत्वे असतात जी शरीरासाठी गरजेची असतात. प्रत्येक मोसमात आपापली फळे असतात जे खाण्याचा आरोग्यतज्ञ सल्ला देतात. दरम्यान, फळे खाण्याचेही काही नियम आहेत. ते जर पाळले नाहीत तर त्यामुळे आरोग्य बिघडू शकते. यातील एक म्हणजे काही फळे खाल्ल्यानंतर चुकूनही पाणी पिऊ नये. जर तुम्ही अशी चूक करत असाल तर यामुळे आरोग्यास नुकसान होऊ शकते.
सफरचंद आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर फळ आहे. यात फायबर मोठ्या प्रमाणात असतात. जे पचनासाठी चांगले मानले जाते. मात्र जर सफरचंद खाल्ल्यानंतर तुम्ही लगेचच पाणी पित असाल तर ते फायबर आतड्यांपर्यंत पोहोचत नाहीत. तसेच पचनाचे काम व्यवस्थित होत नाही.
उन्हाळ्यात कलिंगड मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. कलिंगड खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढली जाते. यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. अशातच तुम्ही जर कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी पिले तर शरीरास नुकसान पोहोचू शकते.
टरबूजालाही उन्हाळ्यात मोठी पसंती दिली जाते. हे रसदायक असे फळ आहे. यात पाण्याचे प्रमाण अधिक असते. मात्र हे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये.
केळी खाण्याचे फायदे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहेत. यात हेल्दी फॅट्स, कॅल्शियम चांगल्या प्रमाणात असते. मात्र केळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. यामुळे ब्लड शुगरचा त्रास होऊ शकतो.
जांभूळ हे अतिशय फायदेशीर आहे. डायबिटीजच्या रुग्णांसाठी हे फळ अतिशय फायदेशीर आहे. याच्या बियांमध्ये अनेक फायदेशीर गुण लपले आहेत.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…