मुंबई: मोबाईलचा स्फोट(mobile blast) झाल्याच्या बातम्या कुठून ना कुठून सतत कानावर येत असतात. अशा घटनांमागची कारणे अनेक असू शकतात. खासकरून उन्हाळ्याच्या दिवसांत अशा घटना घडण्याच्या शक्यता अधिक असतात. खरंतर, स्मार्टफोन्स आणि छोट्या डिव्हाईसमध्ये फार कमी जागेत अधिक क्षमतेची बॅटरी असते. अशातच स्मार्टफोन युजर्सनी खूपच सावधानता बाळगली पाहिजे. जाणून घेऊया फोनमध्ये आग कशी लागते, याचे कारण काय आहे आणि यापासून बचावासाठी काय करता येईल.
खरंतर, स्मार्टफोनचा स्फोट होण्याच्या अधिकाधिक घटना बॅटरीमुळे होतात. जेव्हा फोन उन्हाच्या संपर्कात अधिक येतो तेव्हा बॅटरी गरम होते. अधिक तापमान वाढल्याने तसेच फोनचे कव्हर अतिशय जाड असल्यासही ही समस्या येते. याशिवाय फोनवर अधिक दबाव पडल्यास अथवा बराच वेळ वापरल्याने तो गरम होतो.
खराब क्वालिटीच्या स्वस्त चार्ज अथवा केबलचा वापर केल्याने बॅटरीमध्ये शॉट सर्किट होऊ शकतो. अनेक फोन्ससोबत आजा चार्जिंग अॅडॉप्टर मिळत नाही. अशातच जुगाड करून चार्ज करण्याच्या नादात चुकून ब्लास्ट होण्याची शक्यता वाढते. तसेच दीर्घकाळ फोन चार्जिंगला लावल्यानेही स्फोटाची शक्यता वाढते.
जर तुमच्या फोनची बॅटरी जुनी झाल्यास अथवा खराब झाली असेल तर स्फोटाचा धोका अधिक वाढतो. जर तुमच्या फोनची बॅटरी फुगली असेल तर तातडीने जवळच्या सर्व्हिस सेंटरमध्ये दाखवून घ्या. उन्हाळ्याच्या दिवसांत बॅटरी सुरक्षित ठेवणे अधिक गरजेचे असते.
जर तुम्ही मोबाईलवर बराच वेळ मोबाईल बघत असाल अथवा व्हिडिओज बघत असाल तर फोन गरम होऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसांत फोन जास्त वापरला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
आपले गॅजेट्स उशी, चादरीच्या खाली ठेवून चार्ज करू नका. कारण यामुळे डिव्हाईस आणखी गरम होऊ शकतात.
मोबाईल फोन जर खूप गरम झाला असेल तर तो लगेचच स्विच ऑफ करा. तसेच मोबाईलचे कव्हर काढून ठेवा. यामुळे तो थंड होईल.
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…