Nitesh Rane : कोल्हापुरच्या गादीबद्दलचा नियम सातार्‍याला का नाही?

Share

शिवरायांच्या वंशजांविरोधात सातार्‍यात उमेदवार उभा करुन मविआने अपमानच केला!

संजय राऊतांनी पंतप्रधानांवरुन केलेल्या टीकेवर आमदार नितेश राणे यांचा सणसणीत पलटवार

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज कोल्हापूरमध्ये महायुतीसाठी (Mahayuti) प्रचारसभा आहे. त्यावर ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) ‘पंतप्रधानांनी कोल्हापूरच्या गादीचा, छत्रपती घराण्याचा अपमान करु नये. छत्रपती घराण्याच्या विरोधात प्रचार म्हणजे गादीचा अपमान’, असं वक्तव्य केलं. यावर भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. ‘शिवरायांच्या वंशजांविरोधात सातार्‍यात उमेदवार उभा करुन महाविकास आघाडीने त्यांचा अपमानच केला आहे’, अशी सणसणीत टीका नितेश राणे यांनी केली.

नितेश राणे संजय राऊतांना उद्देशून म्हणाले, हाच नियम, हीच भूमिका तुम्ही सातार्‍यात असताना का घेतली नाही? त्या ठिकाणी छत्रपती उदयनराजे भोसले उभे आहेत. ती गादी देखील आमच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. शिवरायांच्या वंशजांच्या विरोधात तुतारीचा उमेदवार का उभा आहे? जो नियम तुम्हाला कोल्हापुरात लावायचा आहे, तोच नियम तुम्ही सातार्‍यातही लावा, असं नितेश राणे म्हणाले.

देशाचे पंतप्रधान मोदी हे उमेदवाराच्या प्रचारासाठी येत असताना देशासाठी त्यांनी काय केलं आणि कोल्हापूरकरांचं त्यांच्यावर किती प्रेम आहे, हे पाहायचं असेल तर संजय राजाराम राऊतला गर्दीमध्ये मी खुर्ची देऊन बसवतो. मग त्याने आमच्या पंतप्रधान मोदींची जादू बघावी. संजय राऊतने याआधी वंशजांचे पुरावे मागितले होते, त्यामुळे त्याच्या तोंडून आमच्या छत्रपती घराण्याच्या बाजूने काहीही ऐकणं हाच मुळात मोठा अपमान आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली. संजय राऊतने आधी माफी मागावी आणि मग छत्रपतींच्या घराण्याबद्दल बोलावं, असंही नितेश राणे म्हणाले.

गुजरातच्या कांद्याची चव मालकाला विचार

गुजरातचा २००० मेट्रिक टन कांदा परदेशात निर्यात करण्यात येणार आहे, मात्र महाराष्ट्राचा कांदा सडवला जातोय, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. यावर नितेश राणे म्हणाले, गुजरातचा कांदा किती गोड आणि चविष्ट आहे हे तू तुझ्या मालकाला विचार. कारण काही आठवड्यांपूर्वी तुझा मालक आणि त्याचं कुटुंब जामनगरला जाऊन कांदाच खाऊन आले आहेत. तेव्हा अंबानींच्या लग्नात गुजरातचा कांदा तुझ्या मालकाला खटकला नाही. म्हणून गुजरातच्या कांद्याची चव मालकाला विचार आणि मग तुझं थोबाड उघड, असं नितेश राणे म्हणाले.

Recent Posts

बॉलीवूड सेलिब्रिटींनी केले भारतीय जवानांच्या शौर्याचे कौतुक!

श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…

11 minutes ago

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…

1 hour ago

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…

1 hour ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

2 hours ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

2 hours ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

2 hours ago