रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीने (ED) जमीन घोटाळ्याप्रकरणी जानेवारी महिन्यात अटक केली. यानंतर हेमंत सोरेन यांनी त्यांचे चुलते राजाराम सोरेन यांचं निधन झाल्यामुळे १३ दिवसांचा जामीन द्यावा, अशी मागणी केली होती. या तात्पुरत्या जामिनावर आज ईडी कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे.
हेमंत सोरेन यांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं होतं की, त्यांचे चुलते राजाराम सोरेन यांचं निधन झालं आहे. त्यांच्या क्रियाकर्मासाठी १३ दिवसांचा जामीन द्यावा. परंतु ईडी कोर्टाने हेमंत सोरेन यांना तात्पुरता जामीन देण्यास नकार दिला आहे. कोर्टाने सोरेने यांची याचिका फेटाळून लावली आहे.
दरम्यान, जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने हेमंत सोरेन यांना अटक केली आहे. सध्या ते होटवार जेलमध्ये आहेत. या प्रकरणी कोर्टात सुनावणी झाली आणि दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निर्णय सुरक्षित ठेवला.
यापूर्वी हेमंत सोरेन यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. २४ एप्रिल रोजी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात म्हटलं होतं की, ईडीच्या अटकेविरोधातील याचिकेवर हायकोर्ट निर्णय देत नाहीये. उच्च न्यायालयाने २८ फेब्रुवारी रोजी आपला निकाल राखून ठेवला होता.
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…