धावत्या रेल्वेत कसे ऑर्डर करणार बाहेरचे जेवण? ही आहे पद्धत

Share

मुंबई: भारतीय रेल्वे(indian railway) आता जगातील सर्वात चांगली सुविधा देणारी रेल्वे सेवा बनत आहे. रेल्वेच्या प्रवासादरम्यान आता लोकांना बऱ्याच सुविधा मिळतात. याआधी लोकांना रेल्वेच्या आत जे काही खायला मिळत असे तेच ऑर्डर करता येत होते. मात्र आता लोक रेल्वेमध्ये बसल्या-बसल्या बाहेरचे खाणे ऑर्डर करू शकतात. जाणून घ्या कसे ते…

अॅप अथवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मागवू शकता

भारीय रेल्वे प्रवाशांसाठी सतत चांगल्या सोयीसुविधा आणत आहे. आता प्रवाशांना आपल्या आवडीचे खाणे रेल्वेत बसल्या बसल्या मिळणार आहे. आयआरसीटीसीकडून यासाठी वेगळी वेबसाईट बनवण्यात आली आहे. जेवण ऑर्डर करम्यासाठी तुम्ही www.ecatering.irctc.co.in वेबसाईटवर जाऊन ऑर्डर करू शकता.

सोबतच भारतीय रेल्वेकडून +91-8750001323 हा व्हॉट्सअॅप नंबरही जारी करण्यात आला आहे. यावर मेसेज पाठवून तुम्ही जेवण ऑर्डर करू शकता. तुम्ही केवळ जेवणच ऑर्डर करू शकत नाहीत तर तुमची ऑर्डर कुठपर्यंत आली हे ही पाहू शकता.

असे करू शकता ऑनलाईन ऑर्डर

रेल्वेमध्ये ऑनलाईन खाणे मागवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी www.ecatering.irctc.co.in या वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या रेल्वेचा नंबर आणि बोर्डिंगची तारीख निवडावी लागेल. यानंतर तुम्हाला स्टेशन निवडावे लागेल. यानंतर फाईंड फूड ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुम्हाला रेस्टॉरंट निवडावे लागेल. यानंतर पीएनआर नंबर टाकून तुम्ही तुमचे खाणे ऑर्डर करू शकता. याशिवाय स्विगी, झोमॅटोसह अनेक फूड डिलीव्हरी कंपन्या आयआरसीटीसीसोबत मिळून प्रवाशांपर्यंत खाणे पोहोचवण्याचे काम करत आहेत.

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

43 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

1 hour ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

2 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

2 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

3 hours ago