मुंबई : भारतात १९ एप्रिल २०२४ ते १ जून २०२४ या कालावधीत १८ व्या लोकसभेच्या ५४३ सदस्यांची निवड करण्यासाठी सात टप्प्यांत सार्वत्रिक निवडणूक (Loksabha Election) होणार आहे. ४ जून २०२४ रोजी याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी आजपासून मतदानाचा (Voting) पहिला टप्पा सुरु झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रात विदर्भातील (Vidarbha) रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदार संघात मतदान होत आहे.
देशातील १०२ जागांवर मतदान होणार आहे, यामध्ये महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात मतदान होणार आहे. २१ राज्यांमध्ये १०२ मतदार संघात १६२५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. सकाळी ७ वाजता मतदान सुरु झाले आहे तर ते संध्याकाळी ६ पर्यंत चालू असणार आहे.
भंडार-गोंदिया – ५६.८७ % मतदान
चंद्रपूर – ५५.११% मतदान
गडचिरोली चिमूर – ६४.९५% मतदान
नागपूर – ४७.९१% मतदान
रामटेक – ५२.३८% मतदान
मतदान केंद्रांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जवान तैनात करण्यात आले आहेत. सर्वाधिक मतदान गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघात झालेलं आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सकाळी सात ते दुपारी तीन पर्यंतच मतदान असणार आहे. हा नक्षली भाग असल्याने वेळेची मर्यादा आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभा मतदारसंघांसाठीही आज मतदान होत आहे.
श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…