कोलकाता: पश्चिम बंगालच्या(west bengal) मुर्शिदाबादमध्ये रामनवमीच्या(ram navmi) उत्साहादरम्यान दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. खरंतर, मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या रेजीनगर स्थित शक्तिपूर भागात बुधवारी संध्याकाळी राम नवमीनिमित्त शोभायात्रेदरम्यान हिंसाचाराची घटना घडली. यात काही लोक जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. असाही दावा केला जात आहे की जेव्हा राम नवमीची शोभायात्रा काढली जात होती तेव्हा या भागात दगडफेक सुरू झाली आणि लोकांना छतावरून दगड फेकताना पाहिले गेले. दरम्यान, पोलिसांना हे रोखण्यासाठी लाठी चार्जही करावा लागला. भाजपचा आरोप आहे की रेजीनगरमध्ये हिंदू भक्तांना निशाणा बनवण्यात आले.
मुशिर्दाबाग जिल्ह्यातील शक्तिपूरमध्ये बुधवारी संध्याकाळी रामनवमीनिमित्त शोभा यात्रेदरम्यान स्फोटही झाला. यात एक महिलाही जखमी झाली. पोलिसांच्या माहितीनुसार या जखमी महिलेला मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज व रुग्णालयात नेण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट बुधवारी संध्याकाळी झाला. यात एक महिला जखमी झाली. या घटनेचा तपास केला जात आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केले नाही की हा स्फोट बॉम्बमुळे झाला की इतर कारणांनी.
अशीही माहिती आहे की ही घटना बुधवारी संध्याकाळी शक्तिपूर भागात झाली. या ठिकाणी एक समूह राम नवमीनिमित्त जल्लोष करत होता. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले ज्यात या भागात लोक आपल्या छतावरून शोभायात्रेवर दगडफेक करताना दिसत आहे. यावेळी गोंधळ झाल्याने तो आवरम्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
दरम्यान, भाजपचे नेते अमित मालवीय यांनी ट्वीट करत आरोप केला की मुर्शिदाबादच्या रेजीनगरमध्ये हिंदू भक्तांना राम नवमीच्या उत्सवादरम्यान निशाणा बनवण्यात आले. अमित मालवीय म्हणाले, ममता बॅनर्जी पश्चिम बंगालसाठी कलंक आहेत. त्यांनी पुन्हा एकदा रामनवमीच्या शोभायात्रेच्या सुरक्षेत विघ्न आणले. मुर्शिदाबादच्या रेजीनगरमध्ये हिंदू भक्तांना निशाणा बनवण्यात आले. या भागात हिंदू अल्पसंख्यांक आहेत.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…