Raj Kundra: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राज कुंद्रावर ईडीची कारवाई!

Share

तब्बल ९७.७९ कोटी रुपयांची संपत्ती जप्त

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला ३ वर्षापूर्वी पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावर त्याने जामीनही मिळवला होता. राज कुंद्रावरील पॉर्नोग्राफीचे प्रकरण निवारत असताना आता ईडीने राज कुंद्रा विरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई केली आहे. त्याच्यावर प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंगचा दावा म्हणजेच PMLA 2002 अंतर्गत कारवाई करण्यात आली असून तब्बल ९७.७९ कोटींची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे.

ईडीने बिटकॉइन पॉन्जी स्कॅम अंतर्गत राज कुंद्राविरोधात ही अॅक्शन घेतली आहे. यावेळी जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत पुण्यातील बंगला आणि इक्विटी शेयर यांचा समावेश आहे. राज कुंद्राला यूक्रेनमध्ये मायनिंग फार्म उभं करण्यासाठी गेन बिटकॉइनचे प्रमोटर आणि मास्टरमांइंड अमित भारद्वाजकडून २८५ बिटकॉइन्स घेतले होते. तर या सगळ्या प्रकरणात राज कुंद्रानं हेराफेरी केली होती, असा ईडीने केलेल्या चौकशीत खुलासा झाला आहे.

यापूर्वीही राज कुंद्राची २००० कोटींच्या बिटकॉइन घोटाळ्या प्रकरणी चौकशी केली होती. त्यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी असे सांगितले की; ठाणे क्राइम ब्रान्चमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीसाठी राज कुंद्राची चौकशी करण्यात आली होती. मात्र सध्याच्या घडलेल्या प्रकरणामुळे राज कुंद्राच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

2 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

3 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

4 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

4 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

4 hours ago