मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. एकमेकांना टोले लगावण्याची संधी राजकीय नेते (Political Leaders) सोडत नाहीत. त्यातच भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन (X Account) ‘अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ ‘नावाची एक बालकविता पोस्ट करत उबाठा गट (Thackeray Group) व विशेषतः आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) निशाणा साधला आहे.
आशिष शेलारांनी ‘अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ ‘ या कवितेत उबाठाच्या हिंदूद्वेषाचा उल्लेख केला आहे. याकुबच्या कबरीला साज चढवणाऱ्यांमध्ये हिंदूद्वेषाचा उद्रेक झाला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सतत गद्दार गद्दार म्हणत हे बालिश ढोल बडवत असतात, अशी टीकाही शेलारांनी केली आहे. या सगळ्यात आदित्य ठाकरे यांच्या दारुपार्ट्या चुकतायत, उरलेला गट हे भरलेल्या तलावाप्रमाणे दाखवतायत, असा टोलाही आशिष शेलारांनी कवितेच्या माध्यमातून लगावला आहे.
कवी संदीप खरे यांच्या ‘अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ ‘ या कवितेप्रमाणे ही कविता लिहिण्यात आली आहे. त्यामुळे आशिष शेलारांनी तळटीप लिहून संदीप खरे यांची क्षमा मागितली आहे. शेलारांची कविता वाचा जशीच्या तशी :
अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ लागली कळ,
मातोश्रीच्या युवराजांची केवढी वळवळ,
थोडी थोडी न थोडकी लागली फार,
याकूबच्या कबरीला साज आणि
हिंदू द्वेषाचा विखार…!
अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ ..!
शाखा शाखा गरागरा फिर फिर फिरे
गद्दार.. गद्दार.. बालिश ढोल बडवे
युवराजांची स्वारी बाई तोऱ्यामध्ये खडी
पेग, पेग्विन पार्टीची चुकतेय छम छम घडी!
बुडणाऱ्या बेडकांची या बडबड फार !
इवल्याशा गटाचा हा भरुन तलाव
साबु-बिबु नको..
थोडा मुंबईच्या मातीचा टिळा कपाळी लगाव!
अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ !
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…