Lok Sabha Elections 2024: या राज्यात मतदानाच्या दिवशी खाजगी सेक्टर्सनाही सुट्टी

Share

इंफाळ: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होत आहे. याआधी पू्र्वोत्तर राज्य मणिपूर राज्याच्या प्रशासनाकडून सुट्टीची घोषणा केली आहे. ही सुट्टी पहिल्या टप्प्यातील निर्धारित ४७ विधानसभा क्षेत्रांतर्गत येणारे खाजगी सेक्टरमधील वाणिज्यिक आणि औद्योगिक प्रतिष्ठानच्या सर्व कर्मचाऱ्यांनासाठी पुढील आठवड्यात १९ एप्रिलला असणार आहे.

मणिपूरमध्ये लोकसभेसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिलशिवाय या जागेवर २६ एप्रिललाही मतदान होतील. तसेच या लोकसभेअंतर्गत येणाऱ्या बाकी विधानसभेच्या जागांवर असतील. सामान्य निवडणुकीत मणिपूर एकमेव असे राज्य आहे जिथे लोकसभा निवडणुकीसाठी एकूण २ टप्प्यात मतदान होईल.

या खाजगी सेक्टरर्समध्ये राहणार कर्मचाऱ्यांना सुट्टी

सरकारकडून ज्या खाजगी सेक्टरसाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्यात दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट, कार्यशाळा, शैक्षणिक संस्था, प्रिंटिंग प्रेस, वर्तमान पत्र प्रतिष्ठा, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, आर्थिक संस्थाने, मोटर परिवहन उपक्रम सारख्या क्षेत्रातील सामील आहेत.

इतर १३ विधानसभा विधानसभेच्या जागांसाठी २६ एप्रिलला होणार मतदान

हा आदेश सरकारकडून बाकी १३ विधानसभेच्या क्षेत्रात होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यासाठी २६ एप्रिलला मतदानाच्या दिवशीही लागू राहणार आहे.

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

1 hour ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

2 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

2 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

3 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

3 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

3 hours ago