MI Vs RCB: विराट कोहलीवर नेहमीच भारी रोहित शर्मा, आज होणार सामना

Share

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना खेळवला जात आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरूवात होईल.

फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात बंगळुरूच्या संघाने गेले ३ सामने हरले आहेत. त्यांनी आतापर्यंतच्या ५ सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवला. दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईच्या संघाने ४ पैकी केवळ एक सामना जिंकला आहे. अशातच हा सामना जिंकून दोन्ही संघ पॉईंट्स टेबलमध्ये आपली स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतील.

RCBपेक्षा मुंबई सरस

विराट कोहलीच्या संघापेक्षा नेहमीच रोहित शर्माचा मुंबईचा संघ सरस ठरला आहे. दोन्ही संघादरम्यान आतापर्यंत ३४ सामने रंगलेत. त्यातील २० सामन्यांमध्ये मुंबईने विजय मिळवला. तर १४ सामन्यात बंगळुरूला विजय मिळवता आला. मात्र मागील ५ सामने पाहिल्यास यात आरसीबीचे पारडे जड दिसते. गेल्या ५ सामन्यांपैकी आरसीबीने ४ सामने जिंकलेत.

अशी असू शकते प्लेईंग ११

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या(कर्णधार), तिलक वर्मा, टीम डेविड, रोमारियो शेफर्ड, मोहम्मद नबी, गेराल्ड कोएत्जी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस(कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, सौरव चौहान, कॅमरून ग्रीन, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, रीस टॉपली, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

2 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

3 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

4 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

4 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

4 hours ago