उबाठा गटाच्या उमेदवारीमुळे हातकणंगलेत राजू शेट्टींचा पराभव अटळ

Share

खासदार धैर्यशील माने यांना विश्वास

मुंबई : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळावा, यासाठी मातोश्रीचे उंबरठे झिजवणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना नाकारुन उबाठा गटाने सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे हातकणंगलेत राजू शेट्टींचा पराभव अटळ असल्याचा विश्वास खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीने खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानुसार धैर्यशील माने यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. या माने यांचे तगडे आव्हान असल्याने राजू शेट्टी यांचे महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न सुरु होते. हा मतदारसंघ उबाठा गटाकडे असल्याने शेट्टी यांनी मातोश्रीचे उंबरठे झिजवले. मात्र उबाठा गटाकडून शेट्टी यांना बेदखल करत आज सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारीमुळे  हातकणंगलेत राजू शेट्टींचा पराभव अटळ असल्याचा विश्वास माने यांनी व्यक्त केला आहे.

माने यांनी मतदारसंघात प्रचाराला प्रारंभ केला असून प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. आमदार विनय कोरे यांची माने यांनी भेट घेऊन लोकसभा निवडणुकीची दिशा कशी असेल याबाबत चर्चा केली. महायुतीशी संबंधित सर्व पक्षांचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी होत असून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार माने यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Recent Posts

नालेसफाई नव्हे, ही तर भ्रष्टसफाई! पालकमंत्री आशिष शेलार यांचा थेट हल्ला

मुंबई : "३५ दिवसांत फक्त १० टक्के नालेसफाई? मग उरलेली रक्कम कुठं गेली?" असा थेट…

18 minutes ago

‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरुच! दहापट उत्तर देणार, पाकिस्तानची घाबरगुंडी, केंद्राची सर्वपक्षीय ताकद एकवटली

नवी दिल्ली : भारताच्या यशस्वी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन थांबलेले नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र…

40 minutes ago

Operation Sindoor : पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’!

पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने नष्ट देशभरात मॉकड्रील करण्यापूर्वीच भारताने पहलगाम हल्ल्याचा सूड उगवलाय. पाकिस्तान झोपेतून…

43 minutes ago

पाकिस्तानमधील हवाई संरक्षण यंत्रणा भारताच्या ड्रोन हल्ल्यात उद्ध्वस्त

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये २६ नागरिकांची हत्या केली. नंतर…

45 minutes ago

Operation Sindoor : का दिलं ऑपरेशन सिंदूर नाव?

भारताने पहलगाम हल्ल्याचा सूड उगवलाय. हा सूड उगवण्यासाठी दहशतवादी ठिकाणांवर तिन्ही सैन्य दलांनी संयुक्त कारवाई…

55 minutes ago

शरद पवारांचा ‘पॉलिटिकल स्ट्राईक’; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? काका-पुतण्या एकत्र येणार का?

मुंबई : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा कमालीची हालचाल दिसून येत आहे. दस्तुरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक…

1 hour ago