Umesh Kamat : चाळिशीतील प्रत्येकाच्या मनात चोर असतो…

Share
  • टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल

उमेश कामतने नाटकात, मालिकेमध्ये, चित्रपटामध्ये अभिनयाची मुशाफिरी केलेली आहे. ‘अलिबाबा आणि चाळिशीतील चोर’ हा त्यांचा चित्रपट आलेला आहे. प्रेक्षकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा उंचावलेल्या आहेत.

उमेश कामतचे शालेय शिक्षण बीपीएम स्कूल, खार येथे झाले. त्याचा भाऊ व्यावसायिक नाटकात काम करत होता. जेव्हा तो पाचवीत होता, तेव्हा त्याची रिप्लेसमेंट उमेशने केली होती. सुरुवातीला व्यवसायिक नाटकात त्याने कामे केली आणि त्यानंतर एकांकिकेमधून तो कामे करू लागला. त्यानंतर त्याने रूपारेल कॉलेजमधून कॉमर्समधून ग्रॅज्युएशन केले. पोस्ट ग्रॅज्युएशन पोद्दार कॉलेजमधून केले. आंतर महाविद्यालय एकांकिका स्पर्धेत त्याने कामे केली. पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतल्यानंतर त्याने वामन केंद्रे दिग्दर्शित ‘रणांगण’ नाटकात रिप्लेसमेंटचे काम केले. त्यानंतर ‘आभाळमाया’ या मालिकेत त्याने काम केले. या मालिकेमध्ये बंटी ही व्यक्तिरेखा साकारली होती. संजय मोने व शैला सावंत यांनी दत्तक घेतलेल्या मुलाची ती भूमिका होती. मुक्ता बर्वेंनी त्याच्या धाकट्या बहिणीची भूमिका केली होती. छोटा बंटी या नावाने त्याला सगळे ओळखू लागले होते. ही मालिका त्याच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरली. त्यानंतर या ‘गोजिरवाण्या घरात’, ‘वादळवाट’, ‘असंभव’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ यामध्ये देखील कामे केली.

आदित्य इंगळे या दिग्दर्शकाचा उमेशला फोन आला होता की, तो ‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’ हा चित्रपट करीत आहे व त्यात त्याला भूमिका करायची आहे. या अगोदर या नावाचे नाटक त्याला माहीत होते. या चित्रपटामध्ये अभिषेक नावाची व्यक्तिरेखा तो साकारित आहे. चाळीस वय झाल्यानंतर प्रत्येकाला जीवनात अनुभव आलेला असतो. प्रत्येकाच्या मनात एक चोर असतो.

एखादी अनपेक्षित घटना घडल्यानंतर आपल्या नातेसंबंधावर त्याचा काय परिणाम होतो, मित्रत्वाच्या नात्यात काही बदल होतो का? मित्राची चूक आपण समजून घेतो का? प्रत्येक जण आपल्या स्वभावानुसार वागत असतो. आपण कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं. आपल्या मनातल्या चोराला खतपाणी घालून मोठ करायचं का? संबंधामधून निर्माण होणाऱ्या प्रश्नाची उतरे शोधून ती स्वीकारून समाधानकारक आयुष्य जगायचं हे सारं काही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अनेक मुद्द्यांचा ऊहापोह या चित्रपटात केलेला आहे.

या चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्यसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? असे विचारल्यावर उमेश म्हणाला की, त्याच्या सोबत काम करण्याचा अप्रतिम अनुभव होता. त्याच्या सोबत अजून एक मी चित्रपट केला आहे. लेखकाची भाषा समजून अभिनय करणं तसं कठीण काम असतं; परंतु आदित्य होता, त्यामुळे मला ते सोपे गेलं. कोणाच्या काही सूचना असतील, तर योग्य असल्यास तो त्या स्वीकारतो. चांगली कलाकृती तयार करण्यासाठी तो सतत धडपडत असतो. इतर सगळे चांगले कलाकार असल्यामुळे हा चित्रपट चांगला झालेला आहे.

सध्या ‘जर तर ची गोष्ट’ हे त्याच नाटक सुरू आहे. या नाटकाचा शंभरावा प्रयोग लवकरच होणार आहे. सोनाली खरे. सोबत त्याचा ‘माय लेक’ हा चित्रपट येणार आहे. आदित्य इंगळे दिग्दर्शित अजून एक त्याचा चित्रपट येणार आहे. ‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’ या चित्रपटासाठी आणि भविष्यातील वाटचालीसाठी त्याला हार्दिक शुभेच्छा!

Recent Posts

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

2 hours ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

2 hours ago

भारताकडे तेल, गॅसचा पुरेसा साठा

नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…

2 hours ago

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

2 hours ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

2 hours ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

4 hours ago