जालना : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) दृष्टीने उमेदवार उभा करण्यासाठी मराठा समाजाने (Maratha Samaj) हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मार्गदशनाखाली अंतरवाली सराटी येथे मराठा समाज बांधवाची बैठक बोलवण्यात आली होती. आज सकाळपासून ही बैठक सुरु आहे. संध्याकाळी बैठकीतील निर्णयाबाबत मनोज जरांगे माहिती देणार आहेत. दरम्यान, नुकतेच मनसे पक्षातून बाहेर पडलेले नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी या सभेला उपस्थिती दर्शवली. पुणे लोकसभेतून (Pune Loksabha) उमेदवारी मिळावी, या मागणीसाठी त्यांनी ही हजेरी लावली असल्याचे समजत आहे.
मराठा समाजाच्या आजच्या बैठकीत जरांगे यांनी सांगितल्याप्रमाणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जे इच्छुक आहेत असे कार्यकर्ते आपापल्या गावातील झालेल्या चर्चेचा अहवाल या ठिकाणी घेऊन आले होते. राज्यातील ३६ लोकसभा मतदारसंघांचे अहवाल मनोज जरांगे यांना मिळाले असून त्यांचे वाचन व अभ्यास त्यांनी केला. या बैठकीत निवडणूक लढवणे, उमेदवार उभे करणे, पुढील दिशा ठरवणे यावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यासोबतच पुणे लोकसभा निवडणुकीकरता वसंत मोरे व सहकारी अंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहेत.
मनोज जरांगे म्हणाले आहेत की, मला राजकारण करायचे नाही, माझा तो मार्ग नाही समाजाची जी भूमिका असेल त्या पुढे मी जाणार नाही असे जरांगे यांनी सांगितले. अंतरवाली सराटी येथील आजच्या बैठकीत काय निर्णय होतो या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
वसंत मोरे आजच्या भेटीसंदर्भात म्हणाले की, पुणे लोकसभा निवडणुकीत मी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे, त्या करीता मी अंतरवाली सराटी ता.अंबड येथे मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी, दर्शनासाठी आलो होतो. आज त्यांना पुण्याचा अहवाल समाज बांधवांनी दिला. आज मनोज जरांगे यांची भेट झाली, पण चर्चा झाली नाही. कागदावर त्यांना माहिती दिली आहे. तसेच काल वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोललो आहे.
मी मनसे पक्ष सोडला तसे निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. मी सकल मराठा समाजाचा पाईक आहे. आमच्या पुण्याच्या लोकांनी आमची माहिती दिली आहे आणि त्यामध्ये माझी बाजू मांडली आहे. जरांगे पाटील माझा सक्षम उमेदवार म्हणून विचार करतील अशी अपेक्षा आहे. माझी परत एकदा जरांगे पाटील यांच्या सोबत चर्चा होणार आहे असेही वसंत मोरे यांनी सांगितले.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…