चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट, ४ मुलांचा मृत्यू, आई-वडील गंभीर जखमी

Share

लखनऊ: उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका घरात मोबाईल चार्ज करताना शॉर्ट सर्किट झाल्याने मोठा अपघात घडला. शॉट सर्किट झाल्यानंतर मोबाईलचा स्फोट झाला. यामुळे घरात आग लागली आणि ६ जणांचे कुटुंब गंभीररित्या होरपळले. यात दुर्घटनेत ४ मुलांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची स्थिती गंभीर आहे. ही घटना पल्लवपुरम ठाणे क्षेत्रातील जनता कॉलनीमध्ये घडली. शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली.

मोबाईलच्या स्फोटाने चार मुलांचा मृत्यू

मूळचा मुझ्झफरनगर येथे राहणारे जॉनीचे कुटुंब जनता कॉलनीमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. तो वेठबिगारीच्या कामाला होता. होळीमुळे शनिवारी तो घरीच होता. त्याची पत्नी बबिता जेवण बनवत होती. त्यांची मुलगी सारिका(१०), निहारिका(८), मुलगा गोलू(६) आणि मुलगा कालू(५) खोलीत होते.

या खोलीच्या बोर्डावर मोबाईल चार्जिंगला लावला होता. विजेच्या बोर्डामध्ये लावलेल्या चार्जरमध्ये अचानक शॉट सर्किट झाले आणि ठिणगी उडून तेथील बेडवर पडली आणि आग लागली. आगीने लगेचच विक्राळ रूप धारण केले. आगीने वेढल्याने बबिता, सारिका आणि जॉनी यांनी मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र ते या आगीत गंभीररित्या होरपळले.

जोरजोरात आवाज ऐकून शेजारी आले. सर्वांना एक एक करून बाहेर काढले. सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथून त्यांना मेरठच्या लाल लजपतराय मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले.

आई-वडिलांची प्रकृती गंभीर

उपचारादरम्यान मेडिकल कॉलेजमध्ये निहारिक आणि कालू यांनी प्राण सोडले. बाकी सर्वांवर उपचार सुरू होते.मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृ्त्यू झाला. पत्नी-पतीची स्थिती नाजूक झाली आहे.

Tags: mobile blast

Recent Posts

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

27 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

1 hour ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

2 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago