तुम्ही BSNL वापरता का? तर हे जरूर वाचा

Share

मुंबई: भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने(BSNL) आपल्या स्वस्त प्लानमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. याचा सरळ परिणाम त्यांच्या लाखो युजर्सवर पडणार आहे. खरंतर, या कंपनीने आपल्या ९९ रूपयांच्या प्लानची व्हॅलिडीटी कमी केली आहे. यामुळे जे युजर्स हा प्लान वापरत होते त्यांना आता हा प्लान आधीपेक्षा महाग पडणार आहे.

बीएसएनएलने महाग केला प्लान

दरम्यान, युजर्सला आता बीएसएनएलच्या या प्लानसाठी ९९ रूपयेच खर्च करावे लागतील मात्र त्याची व्हॅलिडिटी आधीपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे आता या प्लानसाठी आधीच्या तुलनेत जास्त पैसे खर्च करावे लागतील. बीएसएनएलच्या ९९ रूपयांच्या प्लानमध्ये आधी १८ दिवसांची व्हॅलिडिटी दिली जात होती. मात्र आता युजर्सला केवळ १७ दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. बीएसएनएलने या प्लानच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही मात्र व्हॅलिडिटी कमी करून या प्लानच्या डेली कॉस्टमध्ये वाढ केली आहे.

बीएसएनएलच्या युजर्सला या प्लानसाठी रोजचा खर्च ५.५० रूपये होत होता. आता त्यांचा हा खर्च ५.८२ रूपये इतका झाला आहे. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मइते. या प्लानमध्ये युजर्सला कोणतेही डेटाचे फायदे अथवा इतर फायदे मिळत नाहीत.

हा प्लान त्या लोकांसाठी आहे ज्यांना इंटरनेट डेटाची नव्हे तर केवळ कॉलिंगसाठी रिचार्ज प्लान हवा आहे. अशातच या युजर्सना आता हा बीएसएनएलचा प्लान महाग पडणार आहे.

काही दिवसांपूर्वी एअरटेलनेही आपल्या दोन रिचार्ज प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे. एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की टेलिकॉम कंपन्यांना इंडस्ट्रीमध्ये टिकून राहायचे असेल तर रिचार्ज प्लानच्या किंमतीत वाढ करावीच लागेल.

Tags: bsnlrecharge

Recent Posts

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

14 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

16 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

36 minutes ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

56 minutes ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

1 hour ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

1 hour ago