या चि-याच्या खाणी आणि विना नंबरप्लेट गाड्या कुणाच्या?

Share

टॅक्स चुकवून विना नंबरप्लेट गाड्यातून होते चिऱ्यांची वाहतूक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध विभागात मोठ्या प्रमाणात आरटीओचा टॅक्स चुकवून विना नंबरप्लेट गाड्यातून खुलेआम चिऱ्याची वाहतूक केली जात असून याकडे वाहतूक पोलीस पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. त्याचा तोटा सरकारला होत असून मोठ्या प्रमाणात टॅक्स चुकविला जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात टॅक्स चुकवून विविध प्रकारची वाहतूक केली जात आहे. तसेच कोकणामध्ये मिळणारा जांभा चिरा आणि त्याची वाहतूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ट्रक, डंपर तसेच ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो. मात्र प्रादेशिक परिवहन विभागाचा म्हणजेच आरटीओचा टॅक्स न भरताच काही वाहने बिना नंबर प्लेट गाड्या भरधाव वेगाने हाकत असून त्याचा त्रास जनतेला होत आहे.

तसेच विविध शहरामधून असणाऱ्या वाहतूक पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक गाड्या विनानंबर प्लेट गाड्यातून चिऱ्याची वाहतूक करत असून गाडीच्या पुढेही नंबर नाही आणि मागेही नाही. मात्र अशा गाड्यांवर वाहतूक पोलिसांकडुन कोणतीच कारवाई केली जात नाही.

पोलिसांच्या समक्ष बिनधास्तपणे हे चालक वाहने चालवत असून भरधाव वेगाने जाणाऱ्या या चिरे वाहतुकीमुळे अनेकवेळा अपघाताचा धोका निर्माण होतो. रत्नागिरी जिल्ह्याच्या नवीन वाहतूक निरीक्षकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रत्नागिरी जिल्हा हा एका उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम जिल्हा पोलीस अधिक्षकांनी केले असुन विनानंबर प्लेट गाड्यांमुळे हा विषय चर्चेला आला आहे. तसेच आमदार लिहिलेल्या गाड्यांवरही नंबर प्लेट नसल्यामुळे आणि त्यावर पोलीस कोणतीच कारवाई करत नसल्याचे पुढे आले आहे.

सर्वसामान्यांसाठी दंडाचे हत्यार उपसले जात असताना गडगंज असणाऱ्या चिरे वाहतूक आणि अन्य वाहनांवरती का कारवाई केली जात नाही. याकडे कोकण परिक्षेत्राचे पोलीस अधिकारी तसेच महाराष्ट्राचे पोलीस महानिरीक्षक यांनी या गंभीर विषयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी होणारी ही नंबर प्लेट शिवाय गाड्यांची वाहतूक सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय झाली आहे.

Recent Posts

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

17 minutes ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

5 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

5 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

5 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

5 hours ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

6 hours ago