नवी मुंबई(मच्छिंद्र पाटील) – नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ऐरोली येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य शिवस्मारकाच्या भुखंडाची पाहणी शिवसेना (शिंदे गटांचे) जिल्हा अध्यक्ष विजय चौगुले यांनी केली. लवकरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवस्मारकाच्या कामांचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती विजय चौगुले यांनी दिली.
ऐरोली मध्ये शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे यासाठी शिवसेना शिंदे गटांचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. चौगुले यांच्या पाटपुराव्याला यश आले असून स्मारकांसाठी ऐरोली सेक्टर १० ए येथील भुखंड क्रमांक २० हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांसाठी ५ हजार स्केवर फुट चा भुखंड सिडकोकडून पालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आला.
या भुखंडावर स्मारक उभारण्याच्या कामाची वर्कऑर्डर(कार्यादेश) देण्यात आली असून १३ कोटी रुपये खर्च करुन शिवस्मारक साकरण्यात येणार आहे. हे स्मारक पुर्ण करण्यासाठी पालिकेने ठेकेदाराला दोन वर्षाचा कालावधी दिला आहे. पण हे स्मारक येत्या सहा महिन्यातच ठेकेदारांकडून पुर्ण करुन घेऊ असा विश्वास विजय चौगुले यांनी व्यकत केला आहे. या स्माकरांच्या ठिकाणी ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा ३६ फुटी पुतळा उभारण्यात येणार आहे. तर येथील शिवस्मारकांमध्ये शिवकालीन शस्त्र देखील या स्मारकांमध्ये ठेवण्यात येणार आहे. ऐरोली मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्माकर उभारण्यात येणार असल्यामुळे नवी मुंबईची आयकॉनिक म्हणून ओळख होणार आहे असे विजय चौगुले यांनी स्पष्ट केले.
ऐरोली मध्ये शिवस्मारक व्हावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर सिडकोकडून पालिकेला भुखंड मिळाला असून आता या स्माकरांच्या कामाची वर्क ऑर्डर ठेकेदाराला देण्यात आली आहे. येत्या आठवडयाभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या स्मारकांचे उद्घाटन होईल. स्मारकांसाठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला असला तरी सहा महिन्यात स्मारक तयार करण्यात येईल.
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…