१०० पैकी ४० रूपये खाण्यापिण्यावर खर्च करतात भारतीय, ड्रिंक्स ते पॅकेज्ड फूडला अधिक पसंती

Share

मुंबई: भारतीय कुटुंब आपल्या कमाईतील बराचसा भाग आपल्या खाण्यापिण्यावर खर्च करतात. गेल्या काही वर्षात भारतीयांच्या खर्च करण्याच्या पद्धतीत मोठे बदल झाले आहेत. खास बाब म्हणजे हे बदल शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये पाहायला मिळत आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशातील कुटुंबांची आपल्या घरगुती खर्चासाठीचा ताजा रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टवरून समजते की आजही भारतीय कुटुंबे आपल्या कमाईतील सर्वाधिक भाग खाण्यापिण्यावर खर्च करतात.

१०० पैकी ३९.७० रूपये खाण्यापिण्यावर खर्च करतात भारतीय

NSSOने जारी केलेल्या आकडेवारीनुसार शहरी भागात राहणारे भारतीय कुटुंब १०० पैकी ३९.७ रूपये केवळ खाण्यापिण्यावर खर्च करतात. तर ग्रामीण भागातील कुटुंब १०० पैकी ४७ रूपये खाण्यापिण्यावर खर्च करतात. या सर्वेक्षणात हे ही आढळले की गेल्या काही वर्षात भारतीयांनी धान्यावर होणारा खर्च कमी केला तर दूध आणि पॅकेज्ड फूडवर अधिक खर्च करत आहेत.

या सर्वेक्षणात हे ही आढळले की भले भारतीय आपल्या कमाईतील एक मोठा भाग खाण्या-पिण्यावर खर्च करत आहेत. मात्र या खर्चामध्ये गेल्या २० वर्षात घट झाली आहे.

दूध आणि पॅकेज्ड फूडवर अधिक खर्च

दूध आणि पॅकेज्ड फूडवर होणाऱ्या खर्चामध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. दूध आणि पॅकेज्ड फूडवर होणाऱ्या खर्चात ४.२ टक्के वाढ झाली आहे. तर धान्यावर होणाऱ्या खर्चामध्ये ७.९ टक्के घसरण झाली आहे.

एंटरटेनमेंट आणि कपड्यांची जोरदार खरेदी

NSSOच्या माहितीनुसार भारतीय एंटरटेनमेंटवर आपल्या कमाईतील ६.५ टक्के भाग खर्च करत आहे. तर कपड्यांवर भारतीय कुटुंब आपल्या कमाईतील ५.४ टक्के भाग खर्च करत आहे. मेडिकल खर्चावर कमाईतील ५.९ टक्के भाग खर्च होत आहे. तर वाहनावर भारतीय कुटुंब ८.५ टक्के भाग खर्च करत आहे. तर अभ्यासावर भारतीय कुटुंब आपल्या कमाईतील ५.७ टक्के भाग खर्च करत आहेत.

Recent Posts

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…

6 minutes ago

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…

10 minutes ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

23 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

43 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

1 hour ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

1 hour ago