Ashish Shelar : पत्रकार पोपटलाल यांचा अग्रलेख की हग्रलेख?

Share

आमच्या कामांचं श्रेय घेण्यासाठी आवाज करणार्‍या राजकीय बगळ्यांना मुंबईकरच बाजूला करतील!

भाजपा आमदार आशिष शेलार यांचे उबाठाच्या संजय राऊत व आदित्य ठाकरेंना जबरदस्त टोले

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सामनाच्या अग्रलेखातून खालच्या पातळीची भाषा वापरत सत्ताधारी पक्षांवर टीका करतात. काल सामनाच्या अग्रलेखात त्यांनी भाजपा पक्ष (BJP Party) आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर टीका केली. यावर काल भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ‘स्वतःचा पक्ष संपलेल्या लोकांनी भाजपा संपवण्याची भाषा करु नये. संजय राऊतच्या दहा पिढ्या देखील भाजपाला संपवू शकणार नाहीत’, अशी टीका केली होती. यानंतर आता भाजपा आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी देखील संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे. राऊतांचा ‘पत्रकार पोपटलाल’ असा उल्लेख करत आशिष शेलारांनी त्यांना चपराक लगावली आहे.

आशिष शेलार म्हणाले की, पत्रकार पोपटलाल यांचा अग्रलेख आज सामनामध्ये आला आहे. तो अग्रलेख आहे की हग्रलेख आहे? ते रात्री बसतात आणि सकाळी लिहितात. या बांडगुळ पक्षांना दिल्ली भाजपने जागा दाखवली आहे. संजय राऊत आता तुमच्या पक्षाला बैठकीसाठी नॅनो गाडी लागेल, अशी जहरी टीका त्यांनी संजय राऊतांवर केली आहे.

आदित्य ठाकरेंनाही लगावला टोला

आशिष शेलार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या सरकारने बाजू नीट लावली नाही. त्यामुळे मराठा आरक्षण गेले होते. मराठा समाजाच्या प्रत्येक मागणीचा सरकार विचार करेल, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी काही राजकीय बगळे आवाज काढत आहेत. अशांना बाजूला सारण्यासाठी मुंबईकर तयार आहेत, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) लगावला आहे.

…त्यावेळी मनोज जरांगे गप्प का?

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. यावर आशिष शेलार म्हणाले की, ‘मराठा समाजाला हे मान्य नाही, ते मान्य नाही, अशी भाषा मराठा समाजाला मान्य नाही. जे बोलतात त्या मागे स्क्रिप्ट कोणाची आहे? मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) काळात आरक्षण गेले त्यावेळी तुम्ही गप्प का बसला? शरद पवार (Sharad Pawar) इतकी वर्षे आरक्षण देऊ शकले नाही त्यावेळी गप्प का बसला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Recent Posts

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

15 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

17 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

38 minutes ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

58 minutes ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

1 hour ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

1 hour ago