जळगांव : रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे दोन गटात झालेल्या दगडफेकीत दोन जण जखमी झाले आहेत. गावामध्ये तणावपूर्ण वातावरण असून घटनास्थळी पोलीस पोहचले आहेत. परिस्थिती नियंत्रणात असुन तहसीलदार बंडू कापसे यांनी शांतता ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला. या वादातून दगडफेक झाली. या दगडफेकीत दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच भुसावळ यावल रावेर या ठिकाणावरून पोलीस कुमक तातडीने ऐनपुर गावी मागवण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेडी यांनी निंभोरा पोलीस स्टेशनला भेट दिली व तेथील परिस्थिती संपूर्ण माहिती घेतली. गावागावात आणि दोन समाजामध्ये वाद निर्माण झाल्या त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
तहसीलदार बंडू कापसे, नायब तहसीलदार संजय तायडे व इतर महसूल अधिकारी त्या ठिकाणी पोहचले आणि तहसीलदारांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…