Chandrashekhar Bawankule : काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस; आणखी मोठे नेते भाजपाच्या संपर्कात

Share

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या (Congress) मोठ्या नेत्यांपैकी एक अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला राम राम केले. तसेच त्यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला. यानंतर ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

चंद्राशेखर बावनकुळे म्हणाले की, मी यापूर्वी अनेकवेळा सांगितले आहे की, काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे. समन्वय घडविण्यासाठी काँग्रेस समर्थ नाही, अंतर्गत धुसफूस आहे. काँग्रेसमधील आणखी मोठे नेते भाजपाच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे, असे त्यांनी म्हटले.

मोदींच्या विकासाच्या संकल्पाला साथ देणाऱ्यांचे स्वागत

अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यांना भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, माझ्याकडे आतापर्यंत कुठलाही प्रस्ताव नाही. मोदींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. त्या संकल्पाला साथ देण्यासाठी आमची विचारधारा स्वीकारत असतील तर त्यांचे स्वागत आहे. काहीही बोलणे झाले नाही, माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव नाही.

मोदींचे वादळ महाराष्ट्रात येईल तेव्हा अनेक पक्ष प्रवेश होतील

आमच्याकडे तीन राज्यसभा उमेदवार निवडून येतील, सगळ्यांकडे आपली स्ट्रेंथ आहे, त्यांचे एक सीट सहज निवडून येईल. कुठल्याही पक्ष प्रवेशाचा फायदा होतो. प्रत्येकाची क्षमता आहे त्याचा फायदा होईल. मोदींचे वादळ जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हा अनेक पक्ष प्रवेश होतील. मोदींच्या गॅरंटीवर विश्वास आहे, भाजपला बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज नाही. अजूनही रोज भाजप पक्षात प्रवेश होत आहेत. राज्यसभेची तयारी करण्याची आम्हाला गरज नाही, असंही बावनकुळे म्हणाले.

Recent Posts

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

1 minute ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

21 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

41 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

44 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

1 hour ago

Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…

2 hours ago