मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची मागणी घेऊन मनोज जरांगे यांचे आदोलन वाशीमध्ये पोहोचले आहे. येथे झालेल्या सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी वाशीमध्ये उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सरकारकडे केलेल्या मागण्याची माहिती दिली.
जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न १०० टक्के निकाली निघत नाही तोपर्यंत सरकारने कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरभरती करून नये अशी मागणी जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शिक्षण मोफत द्या. तसेच सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र काढण्याचा आदेश द्यावा. यासोबतच आंतरवाली सराटीसह राज्यातील इतर ठिकाणचे गुन्हे मागे घेतल्याचे आदेश काढावेत अशी मागणी जरांगे यांनी सरकराकडे केली आहे.
तसेच आरक्षण मान्य झाल्याशिवाय सरकारने कोणत्याही प्रकारची शासकीय भरती करू नये मात्र भरती करायची असल्यास जागा राखीव ठेवण्यात याव्या असेही जरांगे यांनी सरकारला सांगितले. तसेच या मागण्यांसाठी सरकारने सहमती दर्शवल्याची माहितीही यावेळी जरांगेंनी दिली.
आज संध्याकाळपर्यंत शासनाचा निर्णय अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. जर सरकारकडून अध्यादेश निघाला नाही तर आझाद मैदानाच्या दिशेने कूच करणार असल्याचे जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केले.
आंतरवाली तसेच राज्यातील इतर ठिकाणी मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. तसेच समाजाच्या शेवटच्या माणसाला आरक्षण मिळत नाही तोवर १०० टक्के शिक्षण मोफत केले जावे अशी मागणीही यावेळी जरांगे यांच्याकडून करण्यात आली.
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…