Health: ओला नारळ आहे आरोग्यासाठी वरदान, खाल्ल्याने मिळतील भरपूर फायदे

Share

मुंबई: ओला नारळ आपल्या गुणांमुळे आरोग्यासाठी अतिशय वरदान असतो. तुम्ही कोणत्याही मोसमात ओल्या नारळाचे सेवन केल्यास याचे अनेक फायदे मिळतात. खासकरून थंडीच्या दिवसांत ओला नारळ शरीराला भरपूर पोषण देतात. कारण या हंगामात शरीराला अधिक एनर्जीची गरज असते. ओल्या नारळामध्ये भरपूर फायबर आणि आर्यन असतात यासोबतच कॉपर, सेलेनियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतात जे शरीराच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. जर तुम्ही याचे दररोज सेवन केले तर शरीर मजबूत होते आणि एनर्जी भरपूर राहते.

ओल्या नारळाचे आरोग्याला होणारे फायदे

पाचनतंत्र सुधारते

ओल्या नारळामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. हे खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होत नाहीत. ओल्या नारळामध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असते. याच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, पोटात जळजळ या समस्येपासून आराम मिळतो. यामुळे पाचनशक्ती सुधारते.

वजन कमी करण्यात फायदेशीर

वजन कमी करण्यामध्ये ओला नारळ अतिशय मदतगार ठरतो. ओल्या नारळामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते हे खाल्ल्याने बराच काळ भूक लागत नाही. ओल्या नारळामध्ये ट्रायग्लिसराईड असते जे शरीरातील फॅट बर्न कऱण्यास मदत होते. ओल्या नारळाच्या सेवनाने शरीरात कोलेस्ट्रॉलचा स्तर योग्य प्रमाणात राहतो.

मेंदू तल्लख होतो

ओल्या नारळामुळे केवळ शरीरच नाही मेंदूच्या विकासातही फायदा होतो. यात आर्यन आणि व्हिटामिन बी ६ आढळते. यामुळे मेंदूचा विकास होतो. हे खाल्ल्याने मेंदू तल्लख होतो.

स्किन आणि केसांसाठी फायदेशीर

ओल्या नारळामध्ये व्हिटामिन सोबत खूप सारे अँटी ऑक्सिडंट असतात जे स्किनसोबतच केसांनाही पोषण मिळते. यात आढळणारे व्हिटामिन ई त्वचेला सुंदर, स्वस्थ आणि चमकदार बनवतात. यासोबतच यांच्या सेवनाने केसांचा रुक्षपणा आणि तुटण्याची समस्याही कमी होते.

Recent Posts

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीटदर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने आजपासून…

2 minutes ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

16 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

35 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

55 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

58 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

2 hours ago