सोलापूर : दोनच दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरात (Chhatrpati Sambhajinagar) खेळता खेळता तलावात बुडल्यामुळे तीन चिमुरड्यांना आपला जीव गमावावा लागल्याची घटना घडली होती. यामुळे संपूर्ण संभाजीनगर हळहळलं होतं. मात्र, या घटनेतून सावरत नाही तोच पंढरपुरातून (Pandharpur) अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. पंढरपुरात शेततलावात बुडल्याने तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पंढरपूर तालुक्यातील करकंब (Karakamb) येथील मोडनिंब रोडलगत असलेल्या परदेशी यांच्या शेततलावात पडून तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांसह एका मित्राचा समावेश आहे. मनोज अंकुश पवार (वय ११ वर्षे), गणेश नितीन मुरकुटे (वय ७ वर्षे), हर्षवर्धन नितीन मुरकुटे (वय ९ वर्षे) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत.
पाण्याच्या टॅंकमध्ये तीन लहान मुले पडल्याची घटना करकंब परिसरात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेची माहिती मिळताच करकंब पोलिसांनी तात्काळ सदर ठिकाणी धाव घेऊन या तलावातून या तीनही शाळकरी मुलांना बाहेर काढलं. नंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे करकंब परिसरात शोककळा पसरली आहे.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…