तणावापासून सुटका हवीये तर आजपासून खा हे फळ, होतील हे फायदे

Share

मुंबई: आजकालच्या धावपळीच्या युगात तणाव म्हणजेच स्ट्रेस ही एक सामान्य समस्या बनली आहे. काम, कुटुंब, वेळेची कमतरता आणि विविध प्रकार्या जबाबदाऱ्यांमुळे लोकांचा तणाव वाढत चालला आहे. आजकल तरूण पिढीला स्ट्रेस वाढत चालला आहे. कारण त्यांच्याकडे अनेक पर्याय आहेत. तसेच भविष्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत. सोबतच नोकरी, नातेसंबधाचाही त्यांच्यावर दबाव असतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का काही फळे तुम्ही रोजच्या डाएटमध्ये सामील कराल तर हा तणाव कमी करण्यास मदत होऊ शकते.

काही फळांमध्ये अँटी स्ट्रेस गुण असतात. यातील व्हिटामिन्स, मिनरल्स आणि अँटी ऑक्सिडंट तत्व स्ट्रेस हार्मोन कमी करण्यास मदत करतात. जाणून घेऊया या फळांबद्दल…

केळे

केळ्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटामिन बी६ सारखी पोषक तत्वे असतात जे स्ट्रेस हार्मोन कमी करण्यास मदत करतात. पोटॅशियम असे मिनरल आहे जे तणाव नियंत्रित करण्यास कमी करते. हे डोके शांत ठेवण्याचे काम करते. व्हिटामिन बी६, सेरोटोनिन नावाचे न्यूरोट्रान्समीटरचे उत्पादन वाढवण्याचे काम करते.

सफरचंद

सफरचंदामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटामिन सी आणि फायबर असते जे तणाव कमी करण्यास मदत करते. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने तणाव कमी होतो. सफरचंदामध्ये अनेक पोषकतत्वे असतात जे तणाव कमी करण्यास मदत करतात. सफरचंदामध्ये अँटी ऑक्सिडंट्स असतात यामुळे पेशींना नुकसान होण्यापासून मदत होते. सोबतच शरीराचा स्ट्रेसही कमी होतो. याशिवाय सफरचंदामध्ये व्हिटामिन सी आढळते. व्हिटामिन सीमुळे तणाव कमी होण्यास मदत होते. सफरचंद खाल्ल्याने तणाव जाणवत नाही.

डाळिंब

डाळिंब हे एक असे फळ आहे ज्यामुळे तणाव कमी होण्यास होते. डाळिंबामध्ये व्हिटामिन सी आणि अँटी ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. व्हिटामिन सी आपल्या शरीरातील पेशींचे आरोग्य चांगले राखतात आणि तणाव हा्र्मोन कमी करतात. अँटी ऑक्सिडंट फ्री रॅडिकल्शी लढतात .

नासपती

नासपतीमध्ये व्हिटामिन बी आढळते. हे व्हिटामिन आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. बी व्हिटामिनमुळे असे काही रसायन तयार होते ज्याचे नाव आहे सेरोटोनिन. सेरोटोनिन मेंदूमध्ये आढळणारे रसायन आहे. यामुळे मूड चांगला राहण्यास मदत होते.

Tags: fruitshealth

Recent Posts

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

2 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

36 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

1 hour ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

1 hour ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago