मुंबई : देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी (Cold) पसरली आहे. मुंबईला (Mumbai) देखील यंदा थंडीचा तडाखा बसला आहे. मात्र, काही राज्यांत अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) लावलेल्या हजेरीमुळे शेतकऱ्यांना (Farmers) पुन्हा एकदा नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. कोकणात देखील अवकाळी पावसाने ऐन फुलोऱ्यावर आलेल्या आंबा, काजूच्या पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. खराब हवामानामुळे खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामातील पिके मोठ्या प्रमाणात वाया गेली. यानंतर आता पुन्हा एकदा अवकाळीच्या हजेरीमुळे बळीराजाच्या समस्या संपत नसल्याचे चित्र आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणात अवकाळी पाऊस सुरु आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात काल अवकाळी पाऊस पडला. सिंधुदुर्गात आजही सर्वत्र पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. तर दुसरीकडे अवकाळीमुळे किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यताही वाढली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, संगमेश्वर भागांत रिमझिम पाऊस सुरु आहे. जोरदार पावसामुळे तालुक्यातील काही गावांतील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. सकाळी महाबळेश्वर परिसरात एक तास तुरळक पाऊस पाहायला मिळाला. अवकाळी पावसाचा स्ट्रॉबेरी पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. स्ट्रॉबेरीवर काळे डाग आणि रोग पडण्याची दाट शक्यता असल्याने बळीराजाचं टेन्शन वाढलं आहे.
सिंधुदुर्गात सावंतवाडी आणि कणकवली तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाचा तडाखा दिसून येत आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दोडामार्ग तालुक्याला झोडपून काढलं. दोडामार्ग तालुक्यात सोमवारी रात्रीपासून अवकाळी पाऊस सुरू आहे.
पुढील २४ तास कोकणासह राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात आज विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून नाशिक, जळगाव, औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…