मुंबई : नववर्ष सुरु झालं की दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना (10 th Borad and 12 th Board Exam) धडकी भरते. कारण बोर्डाच्या परीक्षा अवघ्या दीड ते दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करणे सोपे व्हावे यासाठी परिक्षेचे वेळापत्रक (Exam Timetable) काही महिने आधीच जाहीर केले जाते. यंदाच्या वर्षीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (Central Board of Secondary Education) दहावी आणि बारावीच्या परिक्षेच्या वेळापत्रकांमध्ये छोटे बदल केले आहे. सुधारित वेळापत्रक पाहून त्यानुसार सर्वांनी अभ्यास करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सीबीएसईने (CBSE) जारी केलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार, काही विषयांच्या पेपरच्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. इयत्ता दहावीची तिबेटमधील पेपर परीक्षा आता २३ फेब्रुवारी रोजी घेतली जाईल, यापूर्वी जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकात हा पेपर ४ मार्च रोजी घेतला जाणार होता. तसेच, इयत्ता दहावीची रिटेल परीक्षा १६ फेब्रुवारीला होणार होती, ती आता २८ फेब्रुवारीला होणार आहे. याशिवाय बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत. बारावी फॅशन स्टडीजची परीक्षा आता ११ मार्चऐवजी २१ मार्चला होणार आहे.
सुधारीत वेळापत्रकानुसार, सीबीएसई बोर्डाकडून दोन्ही इयत्तांच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. दहावीच्या परीक्षा १३ मार्चला संपणार आहेत, तर बारावीच्या परीक्षा मात्र २ एप्रिलला संपणार आहेत. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा एकाच शिफ्टमध्ये सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत घेतल्या जातील.
जे विद्यार्थी २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात परीक्षेला बसणार आहेत, त्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन परीक्षेचं वेळापत्रक पाहता येणार आहे. विद्यार्थी अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर आपलं वेळापत्रक पाहू शकतात. किंवा cbse.nic.in या वेबसाईटवरुनही वेळापत्रक पाहता येऊ शकेल. विद्यार्थी हे वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवरुन डाऊनलोडही करू शकतात. वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…