मुंबई: थंडीचा मोसम हा इतर ऋतूंच्या तुलनेत थोडा आव्हानात्मक असतो आणि यासाठी या मोसमात आपल्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच गरजेचे असते.
थंडीत आपल्याला असे अन्नपदार्थांचे सेवन केले पाहिजे आपल्या शरीराला आतून उष्णता देतील आणि शरीराला ताकद देतील.
आपण सगळ्यांनी घरातील थोरामोठ्या व्यक्तींकडून बदामाच्या फायद्यांबद्दल ऐकले असेल मात्र आज आम्ही तुम्हाला बदामाच्या अशा फायद्यांबद्दल सांगणार आहोत जे ऐकून तुम्ही लगेचच बदामाचा डाएटमध्ये समावेश कराल.
थंडीच्या दिवसांत इम्युनिटी कमी झाल्याने आजारांचा धोका पटकन वाढतो. त्यामुळे आजार होण्याची भिती असते. मात्र जर तुम्ही नियमितपणे बदामाचे सेवन करत असाल तर तुम्ही आजारांपासून तुमचा बचाव करू शकता.
बदाम म्हणजे विविध पोषकतत्वांची खाण आहे. यात व्हिटामिन्स, मॅग्नेशियम, प्रोटीन, रायबोफ्लेविन, झिंकसारखे मिनरल्स असतात. दररोज चार ते पाच भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीरास जबरदस्त ताकद मिळते.
बदाम हाय फायबर आणि प्रोटीनमुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. यामुळे मेटाबॉलिज्म वेगात होण्यास मदत होते. यामुळे बराच वेळ पोट भरलेले राहते.
यात अनेक अँटीएजिंग तत्व असतात जे त्वचेची इलास्टिसिटी अधिक चांगली बनवतात. यामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. यातील व्हिटामिन इ मुळे आपले आरोग्य चांगले राहतेच मात्र त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते.
थंडीच्या दिवसांत शारिरीक हालचाली कमी झाल्याने पाचनाशी संबंधित समस्या सतावतात. अशातच बदामाचे सेवन पाचनतंत्र सुरळीत ठेवण्यास मदत करतात.
बदामामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. हे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर अते. याशिवाय थंड हवेमुळे हाडांचे दुखणेही बदामाच्या सेवनाने दूर होऊ शकते.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…