Share

पासपोर्ट जप्त करण्याची मागणी आमदार नितेश राणे सरकारकडे करणार

दिशा सालियान प्रकरण नागपूरात तापले

संतोष राऊळ

नागपूर (विधानभवनातून) : दिशा सालियान प्रकरणातील आरोपी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) परदेशात पळून जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात लूक आउट नोटीस जाहीर करून त्यांचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी सरकारकडे करणार आहे, अशी माहिती आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी नागपूर विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना केली.

दिशा सालियान प्रकरणात एसआयटी गठित करण्यात आली आणि त्यात तीन अधिकाऱ्यांचा तपास अधिकारी म्हणून समावेश करण्यात आला आहे.

सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीतून सगळी सत्यता बाहेर येईल. आपला मुलगा आरोपी असल्याने उद्धव ठाकरे त्यांचा बचाव करीत आहे. दिशा सालियान आणि सुशांतसिंग राजपूत यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, असे आमदार नितेश राणे म्हणाले.

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपपत्र देण्यास विरोध आहे. ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांनाच देण्यात यावे. रोहित पवार यांच्या मोर्चावर झालेला लाठीमार नियोजित होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

‘संजय राऊत यांचे बंधू मशाल चिन्हावर लढण्यास तयार नाही. त्यांच्या घरी यावरूनच वाद सुरू आहे. त्यांच्यापैकी कोण कुठून लढेल, हा निर्णय राऊतांनी आधी करावा’, असेही राणे म्हणाले.

Recent Posts

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

8 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

10 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

46 minutes ago

Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…

57 minutes ago

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

3 hours ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

3 hours ago