INDIA Alliance Meeting : शेवटी घमंडियांची बैठक रद्दच झाली!

Share

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) दारुण पराभवानंतर पहिल्यांदाच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी उद्या दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक (INDIA Alliance Meeting) बोलावली होती. पण या बैठकीला अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार नसल्याचे समजले. त्यामुळे इंडिया आघाडीत सर्व काही आलबेल नाही हे दिसून आले. अखेर उद्या होणारी बैठक मिचाँग चक्रीवादळामुळे (Michaung Cyclone) रद्द करण्यात आल्याची माहिती काँग्रेसने दिली आहे. पण महत्त्वाच्या नेत्यांची अनुपस्थिती हेच बैठक रद्द होण्यामागील मुख्य कारण असल्याची चर्चा आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) आजारी असल्याने बैठकीला येऊ शकणार नसल्याचे म्हटले होते. शिवाय अखिलेश यादव (Akhilesh Yadav) नाराज असल्याने तेही येणार नाहीत, असं राऊत म्हणाले. तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना या बैठकीबद्दल माहितच नव्हतं, असं त्या म्हणाल्या. थोडक्यात, इंडिया आघाडीतील संवाद बिघडला आहे, हे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, इंडिया आघाडीतील घटक पक्षांना काँग्रेसने विश्वासात घेतलं नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळेच नितीश कुमार, अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी नाराज आहेत. तसेच आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन (Stalin) यांनीही मिचाँग चक्रीवादळामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकणार नसल्याचं कळवलं. त्यामुळे इंडिया आघाडीची बैठक रद्द करण्यात आली आहे.

बुधवारी होणाऱ्या बैठकीला जरी मोठे नेते उपस्थित राहू शकणार नसले तरीही त्या ठिकाणी आता एक अनौपचारिक बैठक होणार असल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे. तसेच उद्या होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याचं काँग्रेसने सांगितलं आहे.

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

2 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

3 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

4 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

4 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

4 hours ago