नाशिक (प्रतिनिधी)– विद्यमान राजकारणाचा घसरलेला दर्जा लक्षात घेता उच्च शिक्षित, सुसंस्कृत व्यक्तिमत्वांनी राजकारणात सक्रिय होणे ही लोकशाहीची अपरिहार्यता आहे.पक्ष कुठलाही असेल, प्रत्येक पक्षाला अशा कार्यकर्त्यांची, नेत्यांची आज गरज आहे आणि म्हणूनच राजकारणापासून स्वतःला अलिप्त ठेवू पाहणारे नाशिकच्या राजकारणातील उच्च शिक्षित, सुसंस्कृत आणि मितभाषी ऍंड शिवाजी सहाणे यांची सदिच्छा भेटू घेऊन त्यांचे मन आणि मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. असे स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी आ. श्रीकांत भारतीय यांनी आज नाशिकमध्ये दिले.
शनिवारी सायंकाळी आ. भारतीय नाशिक दौऱ्यावर आले असता, कुठलेही नियोजन नसतांना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा विचार करीत असलेले ऍड शिवाजी सहाणे यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांसोबत जेवण केल्याने नाशिकच्या राजकारणात खळबळ उडून विविध चर्चेला उधाण आले आहे. या अनुषंगाने आ. भारतीय यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
आ. श्रीकांत भारतीय म्हणाले की, ऍड शिवाजी सहाणे हे भारतीय कुटुंबाचे जुने स्नेही आहे सहाणे, भारतीय कुटुंबियांमध्ये पारिवारिक स्नेहबंध आहेत. याशिवाय ते स्वतः एक उच्च शिक्षित, सुसंकृत तत्ववादी राजकारणी म्हणून ओळखले जातात. आमची मैत्री राजकारणा पलीकडची असून दोन्ही बाजूने आम्ही ती जपत आहोत.
ऍड सहाणे यांचा उच्च शिक्षित सुसंकृतपणा आणि सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या वैशिष्ट्यामुळेच गेल्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघात ते राष्ट्रवादीचे उमेदवार असतांनाही भारतीय जनता पक्षाने त्यांना पाठिंबा दिला होता.ते कुठल्याही पक्षात असले तरी त्यांनी राजकारणात सक्रिय असावे, त्यांच्या सारख्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची राजकारणाला गरज आहे. हा संदेश देणे एवढाच या भेटीचा उद्देश होता आणि आहे.
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…